शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

ग्रामीण भागातील निर्बंध आठवडाभर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली, तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली, तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र निर्बंध आणखी आठवडाभर कायम राहणार आहेत. पॉझिटिव्हिटी रेट दहापेक्षा जास्त असल्याने निर्बंध हटविण्याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

राज्य शासनाने ज्या भागात २९ मेपूर्वी पाॅझिटिव्ह दर दहा टक्क्यांच्या खाली आला तर निर्बंध शिथिल करता येईल, असे जाहीर केले आहे. परंतु, २९ मे रोजी जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह दर ११.३ टक्के असल्याने ग्रामीण भागातील निर्बंध कायम राहणार असल्याचे डाॅ. देशमुख यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामीण भागातदेखील रुग्णसंख्या पाॅझिटिव्ह दर दहा टक्क्यांच्या खाली आला असल्याने पुढील आठवड्यात ग्रामीण भागातदेखील निर्बंध शिथिल होतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ज्या जिल्ह्यात व महापालिका क्षेत्रात पाॅझिटिव्ह दर १० टक्क्यांपर्यंत खाली आला असेल, त्याठिकाणी काही निर्बंध शिथिल करता येतील. निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्या वाढत होती; परंतु आता ग्रामीण भागातदेखील रुग्णसंख्या कमी होत आहे. २९ मे रोजी ग्रामीण भागातील पाॅझिटिव्ह दर ११.३ होता. गेल्या दोन दिवसांत तो १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पुढील काही दिवसांत तो ८ ते ९ टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे डाॅ. देशमुख यांनी स्पष्ट केले; परंतु सध्यातरी ग्रामीण भागात निर्बंध कायम राहतील.

----

खरीप हंगामाची तयारी

ग्रामीण भागात सध्या सर्वत्र खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी ग्रामीण भागात निर्बंध कायम असले तरी शेती उपयोगी खते, औषधे, बी-बियणे, शेती अवजारे आदी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.