शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

रेराचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:14 IST

रेरा कायद्याची महाराष्ट्राने गेल्या ४ वर्षांत प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याने रेरा प्रकल्पांची सर्वाधिक नोंदणी ...

रेरा कायद्याची महाराष्ट्राने गेल्या ४ वर्षांत प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याने रेरा प्रकल्पांची सर्वाधिक नोंदणी करून आपली आघाडी कायम ठेवली आहे. नोंदणीनुसार, महाराष्ट्रात ३०,४५० हून अधिक प्रकल्प व ३०,७८९ रिअल इस्टेट एजंटची रेरा अंतर्गत नोंदणी झाल्यामुळे महाराष्ट्र रेरा खरोखरच इतर राज्यांसाठी एक उदाहरण स्थापित करत आहे. महारेरा संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या १४,५७१ तक्रारींपैकी ९,१५७ तक्रारी निकाली काढल्या आहेत.

महारेराचे संकेतस्थळ अद्ययावत असून सध्या नागरिकांना महारेराच्या वेबसाइटवर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानगी, नकाशे, प्रकल्पामध्ये मिळणाऱ्या सुविधा, प्रकल्पाच्या जमिनीवरील बँकेचा बोजा, न्यायालयात सुरु असलेले खटले/दावे, आदी माहिती पाहावयास मिळते. पुढील काळात प्रत्येक प्रकल्पामधील विकल्या गेलेल्या व शिल्लक असलेल्या सदनिकेची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एक सदनिका अनेकांना विकण्याच्या व्यवहाराला रोख बसेल व अधिक पारदर्शकता येईल.

रेरा कायद्याच्या कलम १४(२) अन्वये, आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर यांच्या शिफारसीनुसार वास्तुशास्त्र आणि संरचनात्मक कारणांमुळे किरकोळ बदल करावयाचे असल्यास विकसकाला फ्लॅटधारकांना माहिती देऊन बदल करता येऊ शकतो. परंतु, बांधकाम मंजूर नकाशात किंवा इमारतीच्या वैशिष्ट्येबाबत इतर कोणताही बदल करावयाचे असल्यास २/३ ग्राहकांची पूर्वसंमती घेणे बंधनकारक आहे. तसेच कलम १५ प्रमाणे २/३ (दोन तृतीयांश) ग्राहकांची पूर्वसंमती घेतल्याशिवाय विकसक प्रकल्प इतर विकसकास हस्तांतरण करू शकत नाही.

महारेराकडे गृहप्रकल्प नोंदणी करताना प्रकल्पाचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची तारीख नोंदविणे अनिवार्य असते. काही कारणांस्तव प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार एक वर्षाची मुदतवाढ दिली जाते. मात्र, त्यानंतरही प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर त्यातील ५१ टक्के ग्राहकांना एकत्र येऊन विकसकास मुदतवाढ देण्यास किंवा महारेराच्या परवानगीने नवा विकसक नेमण्याचे अधिकार आहेत.

रेरा कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, नोंदणीकृत असलेल्या स्थावर संपदा प्रकल्पामधील, कोणताही व्यथित ग्राहक, विकसकाच्या विरोधात महारेराकडे तक्रार दाखल करू शकतो. अशा तक्रारींचा त्वरित निपटारा करण्यासाठी प्राधिकरणाने यंत्रणा उभारली आहे. तक्रारींचे निराकरण सामंजस्याने करण्याचा पर्याय देखील महारेराने उपलब्ध करून दिला आहे. ह्याकरिता सलोखा मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे. पक्षकार आपल्या वकिलांमार्फत सहभागी होऊन सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्नदेखील करू शकतो. परंतु सामंजस्याने तोडगा निघत नसल्यास ग्राहक तक्रारींचा न्याय निवाडा करण्यासाठी महारेराच्या प्राधिकरणासमोर जाऊ शकतो.