शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सक्तीमुळेच ‘आधार’ची आठवण

By admin | Updated: April 25, 2015 05:12 IST

सध्या शहराच्या विविध भागांतील १७ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ८०.४३ टक्के नागरिकांनी नोंदणी केली आहे. विविध शासकीय कामकाजासाठी

मंगेश पांडे, पिंपरी सध्या शहराच्या विविध भागांतील १७ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ८०.४३ टक्के नागरिकांनी नोंदणी केली आहे. विविध शासकीय कामकाजासाठी पुन्हा ‘आधार कार्ड’ची सक्ती केली जाऊ लागल्याने २ महिन्यांपासून ओस पडलेल्या केंद्रांवर गर्दी दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आधार नोंदणीचा पहिला टप्पा २० जानेवारी २०११ ते १६ फेबु्रवारी २०१२ दरम्यान राबविण्यात आला. यामध्ये ५ लाख ५ हजार ४७ जणांची नोंदणी करण्यात आली, तर १९ जून २०१२ पासून नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू केला. या अंतर्गत अद्यापपर्यंत १३ लाख ८९ हजार ६८४ जणांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी आधार नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याने या कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या संबंधित कंपनीने शहरातील काही ठिकाणचे आधार नोंदणी केंद्र बंद केले. शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड बंधनकारक असल्याचे सांगितले जाईल, त्याच वेळी नोंदणीला प्रतिसाद मिळतो. मात्र, इतर वेळी नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महा ई-सेवा केंद्रात आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली. या केंद्रातही हवा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, पुन्हा विविध शासकीय कामकाजासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगितले जाऊ लागल्याने नागरिक आधार नोंदणी केंद्रात येऊ लागले आहेत. मतदारनोंदणी, घरगुती गॅसजोड, शिधापत्रिका, विविध दाखले यासाठी आधारची गरज भासत आहे.