शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाची जखम अद्यापही भळभळतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:56 IST

‘आधी पुनर्वसन मग धरण,’ असे आश्वासन भामा- आसखेड धरणाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिले होते

- शिवाजी आतकरीखेड : ‘आधी पुनर्वसन मग धरण,’ असे आश्वासन भामा- आसखेड धरणाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिले होते. तीस वर्षांनंतरही धरणग्रस्तांची पुनर्वसनाची भळभळती जखम कायम आहे. अधिकाऱ्यांचे कागदी घोडे आणि पुढाºयांच्या धरणग्रस्तांविषयी असणाºया पुतनामावशीच्या प्रेमामुळे भामा- आसखेड धरणग्रस्त अजूनही वेठीला धरला जातोय. धरणग्रस्त तरुणाने शनिवारी घेतलेल्या जलसमाधीने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.१९८९ मध्ये भामा आसखेड धरणाचे भूमिपूजन झाले. खेड, दौंड, हवेली या तालुक्यातील सिंचनाचे नियोजन त्यात होते. काळाच्या ओघात शहरीकरणआणि औद्योगिकरण यासाठी पाणी आरक्षित होऊ लागले. परिणामस्वरूप कालवेही रद्द झाले. शेती सिंचन हा मुख्य विषय बाजूला राहिला. पाण्याचे वाटे घातले गेले. या वाटाघाटीत ज्याचे अस्तित्व पणाला लागले त्याच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचे पाप अधिकारी-पुढाºयांनी केलंय.१ हजार ४१४ खातेदार या धरणामुळे बाधित झाले. संकलन रजिस्टर दुरुस्त करावे, या मागणीनंतरसाधारण २५० खातेदार त्यात वाढले. मात्र, दप्तर दिरंगाईने त्यास अद्याप अंतिम स्वरूप आले नाही. ६५ टक्के पुनर्वसनासाठी रक्कम केवळ १११ खातेदारांनी भरल्यामुळे तेवढेच पुनर्वसनासाठी पात्र अशी शासकीय आकडेवारी सांगते. वास्तविक ४०३ खातेदारांनी पासष्ट टक्के रक्कम भरण्यास आम्हाला संधीच दिली नसल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली.२०१६ मध्ये उच्च न्यायालयाने पात्रता यादी तपासण्याचे आदेश दिले. त्यालाही दोन वर्षे झाली. यात अधिक खोलवर पाहता १ हजार ४१४ धरणग्रस्तांपैकी ४०३ खातेदारांनी पुनर्वसनासाठी प्रयत्न चालवले आहेत. ९०० धरणग्रस्तांचा विषय मात्र अद्यापही अंधारात आहे.>अवहेलना : खोट्या आश्वासनांची खैरातअज्ञान, संघटन नाही, सरकारी पातळीवरील अवहेलना, खोटी आश्वासने, वेळकाढूपणा आणि स्वार्थी राजकारणी यांनी धरणग्रस्तांना छळलंय. तीस-तीस वर्षे वाट पाहावी लागणार असेल तर संयम तरी ठेवणार कसा? याचाच परिपाक म्हणून तरुण धरणग्रस्ताने जलसमाधी घेतली. पुनर्वसन होत नसल्याचा पहिला बळी खेड तालुक्यात गेला आहे. चासकमान, कळमोडी, भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तरुणाच्या जलसमाधीने पुन्हा ऐरणीवर आला आहे.पात्र बाधित खातेदारांना त्यांच्या पसंतीची जमीन देऊन पुनर्वसन करा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. हा आदेश न जुमानता पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी पाणी देण्यासाठी काम सुरू आहे. तीस वर्षांनंतरही पुनर्वसन होत नाही, हे दुर्दैव आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळे शासन हे करीत असल्याचा आरोप धरणग्रस्त करीत आहे. आमचे पुनर्वसन खेड तालुक्यातच करावे, एकरी पन्नास लाख रुपये भरपाई द्यावी, महामार्गाला जे संपादन होते, तसा मोबदला त्वरित द्यावा, असे काही तोडगे धरणग्रस्त सुचवीत आहेत. यातून मार्ग निघू शकतो.