शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाची जखम अद्यापही भळभळतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:56 IST

‘आधी पुनर्वसन मग धरण,’ असे आश्वासन भामा- आसखेड धरणाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिले होते

- शिवाजी आतकरीखेड : ‘आधी पुनर्वसन मग धरण,’ असे आश्वासन भामा- आसखेड धरणाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिले होते. तीस वर्षांनंतरही धरणग्रस्तांची पुनर्वसनाची भळभळती जखम कायम आहे. अधिकाऱ्यांचे कागदी घोडे आणि पुढाºयांच्या धरणग्रस्तांविषयी असणाºया पुतनामावशीच्या प्रेमामुळे भामा- आसखेड धरणग्रस्त अजूनही वेठीला धरला जातोय. धरणग्रस्त तरुणाने शनिवारी घेतलेल्या जलसमाधीने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.१९८९ मध्ये भामा आसखेड धरणाचे भूमिपूजन झाले. खेड, दौंड, हवेली या तालुक्यातील सिंचनाचे नियोजन त्यात होते. काळाच्या ओघात शहरीकरणआणि औद्योगिकरण यासाठी पाणी आरक्षित होऊ लागले. परिणामस्वरूप कालवेही रद्द झाले. शेती सिंचन हा मुख्य विषय बाजूला राहिला. पाण्याचे वाटे घातले गेले. या वाटाघाटीत ज्याचे अस्तित्व पणाला लागले त्याच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचे पाप अधिकारी-पुढाºयांनी केलंय.१ हजार ४१४ खातेदार या धरणामुळे बाधित झाले. संकलन रजिस्टर दुरुस्त करावे, या मागणीनंतरसाधारण २५० खातेदार त्यात वाढले. मात्र, दप्तर दिरंगाईने त्यास अद्याप अंतिम स्वरूप आले नाही. ६५ टक्के पुनर्वसनासाठी रक्कम केवळ १११ खातेदारांनी भरल्यामुळे तेवढेच पुनर्वसनासाठी पात्र अशी शासकीय आकडेवारी सांगते. वास्तविक ४०३ खातेदारांनी पासष्ट टक्के रक्कम भरण्यास आम्हाला संधीच दिली नसल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली.२०१६ मध्ये उच्च न्यायालयाने पात्रता यादी तपासण्याचे आदेश दिले. त्यालाही दोन वर्षे झाली. यात अधिक खोलवर पाहता १ हजार ४१४ धरणग्रस्तांपैकी ४०३ खातेदारांनी पुनर्वसनासाठी प्रयत्न चालवले आहेत. ९०० धरणग्रस्तांचा विषय मात्र अद्यापही अंधारात आहे.>अवहेलना : खोट्या आश्वासनांची खैरातअज्ञान, संघटन नाही, सरकारी पातळीवरील अवहेलना, खोटी आश्वासने, वेळकाढूपणा आणि स्वार्थी राजकारणी यांनी धरणग्रस्तांना छळलंय. तीस-तीस वर्षे वाट पाहावी लागणार असेल तर संयम तरी ठेवणार कसा? याचाच परिपाक म्हणून तरुण धरणग्रस्ताने जलसमाधी घेतली. पुनर्वसन होत नसल्याचा पहिला बळी खेड तालुक्यात गेला आहे. चासकमान, कळमोडी, भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तरुणाच्या जलसमाधीने पुन्हा ऐरणीवर आला आहे.पात्र बाधित खातेदारांना त्यांच्या पसंतीची जमीन देऊन पुनर्वसन करा, असे न्यायालयाचे आदेश आहेत. हा आदेश न जुमानता पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी पाणी देण्यासाठी काम सुरू आहे. तीस वर्षांनंतरही पुनर्वसन होत नाही, हे दुर्दैव आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळे शासन हे करीत असल्याचा आरोप धरणग्रस्त करीत आहे. आमचे पुनर्वसन खेड तालुक्यातच करावे, एकरी पन्नास लाख रुपये भरपाई द्यावी, महामार्गाला जे संपादन होते, तसा मोबदला त्वरित द्यावा, असे काही तोडगे धरणग्रस्त सुचवीत आहेत. यातून मार्ग निघू शकतो.