शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

विद्यार्थी-पालकांचे भरपावसात हाल

By admin | Updated: June 28, 2017 04:26 IST

विविध कामांसाठी शिवाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विविध कामांसाठी शिवाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधांअभावी भरपावसात मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिकेतील दुरुस्ती यांसह विविध कामांसाठी केवळ एकच काउंटर ठेवण्यात आल्याने दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी, सुरक्षारक्षकांबरोबर विद्यार्थी व पालकांचा वाद होताना दिसत आहे.राज्य मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंडळाकडून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिकेतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी सुविधा दिली जाते. मंडळाच्या विभागीय कार्यालयांमधून ही प्रक्रिया केली जाते. पुण्यात शिवाजीनगर येथे विभागीय कार्यालय असून गेल्या काही दिवसांपासून येथे गर्दी होत आहे. सर्व कामांसाठी मंडळाकडून केवळ एकाच काउंटरवर सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज व शुल्क भरण्यासाठी या काउंटरवर मोठी गर्दी होत असून विद्यार्थी व पालकांना दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातच सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्याने त्यांना पावसात भिजण्याशिवाय पर्याय नाही. मंडळाकडून त्यासाठीही काहीही व्यवस्था केलेली नाही. रांग धीम्या गतीने पुढे सरकत असल्याने विद्यार्थी, पालकांना शुक्रवारी मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे तेथील कर्मचारी व सुरक्षारक्षकांसोबत त्यांची वादावादीही झाली. पण एकच काउंटर असल्याने कर्मचाऱ्यांकडूनही काहीही केले जात नव्हते. तीन-तीन तास रांगेत उभे राहूनही अर्ज भरले जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. एवढे शुल्क घेऊनही चांगली सुविधा दिली जात नाही, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.