शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लेखा व कोषागार संचालनालयातील पदभरती कंत्राटी पध्दतीने नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

पुणे : राज्यातील वाढत्या बेरोजगारीने तरुणांचे एकूण मनोबल खचले आहे. असंख्य तरुण आत्महत्येसारखा विदारक पर्याय अवलंबत आहेत. असे असताना ...

पुणे : राज्यातील वाढत्या बेरोजगारीने तरुणांचे एकूण मनोबल खचले आहे. असंख्य तरुण आत्महत्येसारखा विदारक पर्याय अवलंबत आहेत. असे असताना प्रशासन मात्र दोन वर्षे जुनी पदभरती पूर्ण करण्यास सक्षम नाही, ही बाब निंदनीय आहे. लेखा व कोषागार संचलनालयातील एकूण ९३२ रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया २०१९ मध्ये राबविण्यात आली. या पदभरतीमधील पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. हा पूर्णतः प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे. त्यात आता कंत्राटी पदभरती करण्याचा घाट घातला जातोय आम्ही तो हणून पाडू, असा इशारा विद्यार्थी आणि विविध संघटनांनी दिला आहे.

लेखा व कोषागारमधील तीन विभागांसाठी ही भरती राबविण्यात आलेली होती. अमरावती, पुणे आणि कोकण या विभागांसाठी ही पद भरती राबविलेली आहे. यापैकी ८०% पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित केले आहेत. इतर उमेदवार मात्र पात्र असून देखील अद्याप बेरोजगार आहेत. त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचे कुठले ही अधिकार राज्यसरकार आणि प्रशासनास नाही आहेत. कागदपत्र पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणे बंधकारक आहे. पण सध्याच्या स्थितीत कोरोना प्रादुर्भाव, शासनाने ४ मे रोजी टाकलेले पदभरतीवरील निर्बंध अशा कारणाने ही पदभरती लांबणीवर राहिली, अशी माहिती विद्यार्थी शिवाजी इंगवले, आदिती भोसले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली.