शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा समस्येत पुन्हा वाढ

By admin | Updated: February 17, 2015 01:13 IST

येथील कचरा डेपो विरोधातील उरुळी देवाची व फुरसुंगी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेऊन महिना उलटला तरी राज्य शासनाकडून पालिकेस कचरा टाकण्यास जागा दिलेली नाही.

पुणे : महापालिकेचा कचरा टाकला जात असलेल्या फुरसुंगी येथील कचरा डेपो विरोधातील उरुळी देवाची व फुरसुंगी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेऊन महिना उलटला तरी राज्य शासनाकडून पालिकेस कचरा टाकण्यास जागा दिलेली नाही. तसेच डेपोवर कचरा टाकण्याबाबत आठवडाभरात निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या ४७ दिवसांत शहरातील कचरा शहरातच जिरविण्यात पालिकेला यश आले असले तरी, पालिकेला आता ते शक्य नसल्याने कचरापेट्या पुन्हा ओसांडून वाहू लागल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा पसरल्याचे दिसून येत आहे.१ जानेवारीपासून ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर ग्रामस्थांनी आठ दिवसांनी मागे घेतले. मात्र, त्यानंतरही २६ जानेवारीपर्यंत डेपोवर पालिकेच्या गाड्या पाठविणार नसल्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. पुढे त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात डेपोवर गाड्या पाठविण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यानंतर अद्याप या बैठकीस मुहूर्त लागलेला नाही. शिल्लक कचऱ्यावर विल्हेवाट लावणे शक्य झालेले नसल्यामुळे आता पालिकेचीही क्षमता संपत असल्याने कचरा शहरातच पडून आहे. परिणामी शहरात कचऱ्याचे ढीग साचत असून, त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या घाणीमुळे महापलिकेचे कामगारसुद्धा घाणीमुळे आजारी पडत आहेत. अनेक ठिकाणी कचरा साचल्यावर पेटवून दिला जात आहे. त्यामुळे डेपोवर काही प्रमाणात कचरा टाकण्यास जागा न मिळाल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. मात्र, भाजपाचा एक खासदार आणि आठ आमदार असलेल्या पुणे शहरात कचऱ्याच्या या स्थितीमुळे या अभियानालाच हरताळ फासला गेला आहे. या अभियानासाठी हातात झाडू घेऊन फोटो काढण्यासाठी वेळ असलेल्या या पदाधिकाऱ्यांना लाखो पुणेकरांच्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून जागा मिळवून देण्यास वेळ नाही. त्यामुळे या अभियानास किमान पुण्यात तरी ब्रेकच लागल्याचे चित्र आहे.