शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया, जपानच्या सहकार्यातून अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आत्मनिर्भर भारत आणि ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या विश्वासू भागीदार देशांबरोबरचे सहकार्य यातून निर्माण होणारी परस्परपूरक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आत्मनिर्भर भारत आणि ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या विश्वासू भागीदार देशांबरोबरचे सहकार्य यातून निर्माण होणारी परस्परपूरक शक्ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत महत्त्वाची ठरेल,” असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले.

‘आशिया आर्थिक संवाद -२०२१’च्या पाचव्या फेरीचे उद्घाटन आज भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री सिनेटर मेरिसे पेन यांच्या उपस्थितीत झाले. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी ‘रेझिलियंट ग्लोबल ग्रोथ इन अ पोस्ट पँडेमिक वर्ल्ड’ या परिसंवादात भाग घेतला. परिसंवादाची सुरुवात जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशीमित्सू यांच्या ध्वनिमुद्रित संदेशाने झाली. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि परिषदेचे संयोजक माजी राजदूत गौतम बंबावाले यांनी स्वागत केले. ‘कोविडोत्तर जगातील आंतररराष्ट्रीय व्यापार व वित्त क्षेत्राची समीकरणे’ हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे.

डॉ. जयशंकर म्हणाले की, “देशादेशांमधील व्यापार हा समान पातळीवरून व्हायला हवा. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात लहान व मध्यम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतील. या क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परस्पर सहकार्यातून भविष्य साकारण्याचा विचार भारताने नेहमीच जागतिक पातळीवर मांडला. त्यानुसार सत्तर देशांना भारतातून लस निर्यात करण्यात आली. या यादीत लवकरच आणखी चाळीस देशांचा समावेश करण्यात येणार आहे.’’

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेन यांनी सांगितले, “मुक्त व्यापारातील खुलेपणा, बहुपक्षीय व्यापार धोरणाची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या पुरवठा साखळीला चालना ही सरकारसमोरची सध्याची आव्हाने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम मेकॅनिक्स या आधुनिक तंत्रज्ञानातील घटकांचा उपयोग करून घेण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून भविष्यात कोरोनासारखी आपत्ती कोसळली तरी अर्थव्यवस्थेला फार हानी पोचणार नाही.” जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशीमित्सु यांनी सांगितले, की गेले ८ महिने जपानने आपली बहुस्तरीय पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला. ‘हरित आणि डिजिटल अर्थव्यवस्था’ उभारण्यावर लक्ष केंद्रित केले.