शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

ऑस्ट्रेलिया, जपानच्या सहकार्यातून अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आत्मनिर्भर भारत आणि ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या विश्वासू भागीदार देशांबरोबरचे सहकार्य यातून निर्माण होणारी परस्परपूरक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आत्मनिर्भर भारत आणि ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या विश्वासू भागीदार देशांबरोबरचे सहकार्य यातून निर्माण होणारी परस्परपूरक शक्ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत महत्त्वाची ठरेल,” असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले.

‘आशिया आर्थिक संवाद -२०२१’च्या पाचव्या फेरीचे उद्घाटन आज भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री सिनेटर मेरिसे पेन यांच्या उपस्थितीत झाले. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी ‘रेझिलियंट ग्लोबल ग्रोथ इन अ पोस्ट पँडेमिक वर्ल्ड’ या परिसंवादात भाग घेतला. परिसंवादाची सुरुवात जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशीमित्सू यांच्या ध्वनिमुद्रित संदेशाने झाली. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि परिषदेचे संयोजक माजी राजदूत गौतम बंबावाले यांनी स्वागत केले. ‘कोविडोत्तर जगातील आंतररराष्ट्रीय व्यापार व वित्त क्षेत्राची समीकरणे’ हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे.

डॉ. जयशंकर म्हणाले की, “देशादेशांमधील व्यापार हा समान पातळीवरून व्हायला हवा. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात लहान व मध्यम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतील. या क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परस्पर सहकार्यातून भविष्य साकारण्याचा विचार भारताने नेहमीच जागतिक पातळीवर मांडला. त्यानुसार सत्तर देशांना भारतातून लस निर्यात करण्यात आली. या यादीत लवकरच आणखी चाळीस देशांचा समावेश करण्यात येणार आहे.’’

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेन यांनी सांगितले, “मुक्त व्यापारातील खुलेपणा, बहुपक्षीय व्यापार धोरणाची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या पुरवठा साखळीला चालना ही सरकारसमोरची सध्याची आव्हाने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम मेकॅनिक्स या आधुनिक तंत्रज्ञानातील घटकांचा उपयोग करून घेण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून भविष्यात कोरोनासारखी आपत्ती कोसळली तरी अर्थव्यवस्थेला फार हानी पोचणार नाही.” जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशीमित्सु यांनी सांगितले, की गेले ८ महिने जपानने आपली बहुस्तरीय पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला. ‘हरित आणि डिजिटल अर्थव्यवस्था’ उभारण्यावर लक्ष केंद्रित केले.