शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

एसटी अभावी प्रवाशांचे हाल

By admin | Updated: August 13, 2014 04:46 IST

अपु-या एस.टी. बस संख्येमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. राजगुरुनगर बसस्थानकातून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. बस भरगच्च भरून जातात.

दावडी : अपु-या एस.टी. बस संख्येमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. राजगुरुनगर बसस्थानकातून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. बस भरगच्च भरून जातात. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांचे हाल सुरूआहेत. तातडीने आगार प्रशासनाने दखल घेऊन जादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागात जाणारी एस.टी. बससेवा तोकडी पडत आहे. दावडी, वाफगाव, गुळाणी, खरपुड, चिखलगाव, येणवे, आंबोली, डेहणे, वाडा, पाईट, कडूस, शेलपिंंपळगाव या गावातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या गावी येतात. तसेच कामानिमित्त येणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांची संख्या मोठी आहे. स्थानकातून सुटणाऱ्या एस.टी. बसची संख्या कमी आहे. एस.टी.चालकाला चालक केबीनमध्ये प्रवाशी बसल्याने एस.टी. बस चालवण्यात अडथळे येतात. विशेषत: एस.टी. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी महिला व मुलींची मोठी कुचंबणा होते. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे खिशातील पाकिटे व महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.पासधारक विद्यार्थ्यांना एस. टी. बसमध्ये जागा मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून ये-जा करावी लागत आहे. ग्रामीण भागात बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)