शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

By admin | Updated: July 31, 2014 02:51 IST

नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे.

सोमेश्वरनगर : नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या नीरा देवघर धरणात ५६.१६ टक्के, भाटघर धरणात ४९.८६ टक्के, तर वीर धरणात ५९.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर गुंजवणी धरण भरले असून, ७५० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने वीर धरणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे काल रात्रीपासून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारेचे विभागीय उपअभियंता डी. एम. डुबल यांनी दिली. या वर्षी जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने पाऊस पडणार की नाही, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. मात्र, आता गेल्या पंधरा दिवसांपासून धरणक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने आता तिन्ही धरणांनी ५० टक्केचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. रविवार दि. २० जुलैच्या आसपास धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु शुक्रवार २५ जुलैच्या आसपास पावसाचा जोर मंदावला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे. धरण क्षेत्राबरोबरच नीरा खोऱ्यातही दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिरायती भागातील खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या तसेच रखडलेल्या उसाच्या लागणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगामातील पेरण्यांना एक महिना उशीर झाला असला तरीही तूर, सोयाबीन आणि बाजरीच्या पेरण्या अजूनही होऊ शकतात, असे आघारकर अनुसंधान केंद्राचे प्रमुख अजित चव्हाण यांनी सांगितले.(वार्ताहर)