शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

By admin | Updated: July 31, 2014 02:51 IST

नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे.

सोमेश्वरनगर : नीरा देवघर व भाटघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या नीरा देवघर धरणात ५६.१६ टक्के, भाटघर धरणात ४९.८६ टक्के, तर वीर धरणात ५९.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर गुंजवणी धरण भरले असून, ७५० क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने वीर धरणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे काल रात्रीपासून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारेचे विभागीय उपअभियंता डी. एम. डुबल यांनी दिली. या वर्षी जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने पाऊस पडणार की नाही, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. मात्र, आता गेल्या पंधरा दिवसांपासून धरणक्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने आता तिन्ही धरणांनी ५० टक्केचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. रविवार दि. २० जुलैच्या आसपास धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु शुक्रवार २५ जुलैच्या आसपास पावसाचा जोर मंदावला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे. धरण क्षेत्राबरोबरच नीरा खोऱ्यातही दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिरायती भागातील खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या तसेच रखडलेल्या उसाच्या लागणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरीप हंगामातील पेरण्यांना एक महिना उशीर झाला असला तरीही तूर, सोयाबीन आणि बाजरीच्या पेरण्या अजूनही होऊ शकतात, असे आघारकर अनुसंधान केंद्राचे प्रमुख अजित चव्हाण यांनी सांगितले.(वार्ताहर)