शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

‘शक्ती आणि भक्तीसाठी, कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी’ पुण्यातील सात धावपटूंची ‘रनवारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘विठूच्या भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांना कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून विठूरायाचे दर्शन घडलेले नाही. यंदाही आळंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘विठूच्या भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांना कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून विठूरायाचे दर्शन घडलेले नाही. यंदाही आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या वैष्णवांचा मेळा पाहाता येणार नाही. कोरोनाने वारीची परंपराच जणू खंडित झाली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ‘शक्ती आणि भक्तीसाठी, कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी’ कोरोना नियमांचे पालन करून सात धावपटू हे ‘रनवारी’ करणार आहेत. उद्या (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता आळंदी येथून सुरू होणारी ही रनवारी शनिवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता २४० किलोमीटरचे अंतर पार करून पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

भूषण तारक, स्वामीनाथन श्रीनिवासन, जनार्दन कत्तुल, चंद्रकांत पाटील, अजित गोरे, संतोष कोकरे आणि संतोष शेळके हे सात धावपटू या रनवारीमध्ये सहभागी होत आहेत. यातील पाच जण हे पिंपरी-चिंचवड भागातील तर दोघे लोणंद येथील आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीमार्गे ही ‘रनवारी’ ते पूर्ण करणार आहेत. विशेष म्हणजे, हे सातही जण ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटू आहेत. प्रशांत भोसले, दिगंबर जानभरे, नंदकुमार मुसळे आणि तानाजी देवकर हे त्यांचे पाच मित्र दोन गाड्यांसह या धावपटूंसोबत मदतीसाठी राहणार आहेत.

या ‘रनवारी’चे समन्वयक भूषण कटक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मी २०१७ मध्ये रनिंग सुरू केले होते. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर हे अडीचशे किलोमीटर धावण्याची इच्छा होती. मात्र नोकरी आणि व्यवसायामुळे ते शक्य झाले नाही. यावर्षी ही संकल्पना मित्रांना सांगितली. यापूर्वी आम्ही विविध मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. १६१ किलोमीटरची २८ तासांची मॅरेथॉन यांसह आफ्रिकेमध्ये ९० किलोमीटरच्या मॅरेथॉनचा आम्हाला अनुभव आहे. दर वर्षी पालखीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही वारकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने ही वारी करणार आहोत. ‘रनवारी’चे हे २४० किलोमीटरचे अंतर ४२ तासांत करण्याचा आमचा मानस आहे. सलग धावणार असलो तरी १५ ते २० मिनिटे विसाव्यासाठी थांबणार आहोत. सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

----------------------------------------------------------------------------------------

आम्ही ‘रनवारी’ करीत पालखी मार्गाच्या गावात प्रवेश करणार असलो, तरी ग्रामस्थांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. कोरोनाचे नियम पाळून ही वारी आम्हाला करायची आहे. त्यामुळे त्या त्या गावात असणाऱ्या आमच्या काही मित्रमंडळींनाच फक्त याबद्दल सांगितले आहे. - भूषण कटक, समन्वयक, ‘रनवारी’

------------------------------------------------------------------------------------

फोटो- रणवारी, रणवारी लोगो