शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्ह्यांनी पुन्हा खाल्ली उचल

By admin | Updated: May 30, 2014 04:56 IST

हारमधील खंडणीसाठी अपहरण केल्या जात असलेल्या घटनांवर आधारित अजय देवगण याचा ‘अपहरण’ या चित्रपट काही दिवसांपूर्वी येऊन गेला होता़

पुणे : बिहारमधील खंडणीसाठी अपहरण केल्या जात असलेल्या घटनांवर आधारित अजय देवगण याचा ‘अपहरण’ या चित्रपट काही दिवसांपूर्वी येऊन गेला होता़ बिहार, उत्तर प्रदेशामध्ये घडणार्‍या अशा घटनांचे लोण काही वर्षांपूर्वी पुण्या-मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत होत्या़ त्यात प्रामुख्याने परप्रांतीयांचा समावेश असल्याचे दिसून येत होते़ मागील दोन तीन वर्षांमध्ये खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्याच्या गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत होते़ दलाराम राठोड यांच्या खुनानंतर पुन्हा अशा घटनांनी उचल खाल्ली असल्याचे दिसून येत आहे़ पूर्वी अशा गुन्ह्यांमध्ये एक तर परप्रांतीय गुन्हेगार असत किंवा संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग असे़ पण आता स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या पैसे मिळविण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे पुढे आले आहे़ दलाराम राठोड यांचे अपहरण करण्यामध्ये कोंढव्यातील स्थानिक गुन्हेगारांचा हात असल्याचे पुढे आले आहे़ गेल्या वर्षी एप्रिल २०१३ मध्ये मुंबईतील प्लॉट व बंगला आपल्यालाच विकावा यासाठी विनोद ब्रोकर आणि उषा नायर या ज्येष्ठ नागरिकांचे पुण्यातून अपहरण करुन त्यांचा खून करण्यात आला होता़ पुरावा नष्ट करण्यासाठी सातारा येथील एका गावाबाहेर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता़ पोलिसांनी नितीन भाटिया, इब्राहिम श्ेख, रवींद्र रेड्डी व त्यांच्या साथीदारांना याप्रकरणात अटक केली होती़ दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये पाषाण येथील एआरडीई येथे राहणार्‍या रावळ यांचा पाच वर्षांचा मुलगा शुभ यांचे अपहरण करुन त्याचा खून करण्यात आला होता़ त्यांच्या ओळखीचा असलेल्या परमिंदर सिंग या तरुणाने हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले होते़ त्याच्या अगोदर एप्रिल २०१२ मध्ये दिघी येथील शुभम शिर्के याचे त्याच्याच शाळकरी मित्रांनी अपहरण करुन खून केला होता़ त्याच्या वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती़ यातील दोन मुले अल्पवयीन होते़ टीव्हीवरील सीआयडी मालिका पाहून त्यांना ही कल्पना सुचल्याचे पकडल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितले होते़ पुण्यातील सर्वाधिक गाजलेल्या खटल्यामध्ये निगडीतील सागर सहानी प्रकरणाचा समावेश होतो़ १४ आॅगस्ट २००५ मध्ये पिंपरीतून सागर सहानी याचे काही जणांनी अपहरण केले होते़ त्यांना १५ लाख रुपयांची खंडणी दिल्यानंतरही तो आपल्याला ओळखेल म्हणून नाशिक -वापी रोडवर त्याचा खून करुन मृतदेह टाकून दिला होता़ या प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन मोढा हा सौदी अरेबियात पळून गेला होता़ या प्रकरणात सॅटेलाईट फोन, हवाला मार्फत पैसे परदेशात पाठविण्यात आले होते़ विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलीस, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश यांच्यासह अनेक राज्यातील पोलिसांचा सहभाग होता़ परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून सौदी अरेबियातून नितीन मोढा याला भारतात पुन्हा परत आणण्यात पोलिसांना यश आले होते़ या खटल्यात प्रसाद शेट्टी, अरविंद चौधरी, भिकू थांकी, जितेंद्र मोढा, छोटू घैसाईवाला आणि नितीन मोढा यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे़(प्रतिनिधी)