शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

राजगुरुनगरचे रस्ते अंधारात; पाणीपुरवठाही झाला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेने थकीत वीजबिल असल्याने वीज वितरण कंपनीने पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित केला आहे. सोमवारी ...

राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेने थकीत वीजबिल असल्याने वीज वितरण कंपनीने पुन्हा एकदा वीजपुरवठा खंडित केला आहे. सोमवारी (दि. २१) सायंकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला, त्यामुळे शहरातील पथदिवे आणि पाणी योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे.

राजगुरुनगर नगरपरिषदेकडून महावितरण कंपनीला पाणीपुरवठा योजनेचे सुमारे पावणेतीन कोटी रुपये, तर स्ट्रीट लाईटचे ५६ लाख रुपये थकीत वीजबिल येणे आहे. २०१४ मध्ये नगरपरिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून थकीत राहात गेलेले हे बिल आहे. वीजबिल भरणा होत नसल्याने मार्च महिन्यात महावितरणकडून अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी होणाऱ्या त्रासाला कंटाळून शहरातील नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केले होते. तसेच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न तात्पुरता मिटवला होता. दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने तीन टप्प्यात १ कोटी रुपये वीज भरणा केला होता. पुन्हा काही महिन्यात तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोरोना असल्यामुळे नगरपरिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण प्रशासक म्हणून नगर परिषेद वर कामकाज पाहत आहे.

कोट

नगर परिषद कार्यालय, शहरातील पथदिवे व पाणीपुरवठाचे नियमित वीजबिल भरणा नगरपरिषद करीत आहे. उत्पन्न कमी व मोठी रक्कम असल्याने थकीत वीजबिल भरणा वेळेवर होत नाही. याबाबत प्रशासकीय स्तरावर ऊर्जा मंत्र्यांकडे बिलमाफीसाठी प्रयत्न नगर परिषद करणार आहे.

- सुनील निकाळजे, विद्युत अभियंता, नगरपरिषद

चौकट

नगरपरिषद प्रशासनाशी वारंवार चर्चा करूनही वीजपुरवठा खंडित केला. तेव्हापासून म्हणजे गेले दोन महिने सर्व विभागांचे मिळून सुमारे सहा लाख रुपयांचा वीजबिल भरणा नियमितपणे होत आहे.

- अविनाश सावंत, सहायक अभियंता, राजगुरुनगर विभाग महावितरण कंपनी.