शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

त्याच जागी पुतळा उभारा

By admin | Updated: February 12, 2015 02:26 IST

बारामतीकरांचे आकर्षण ठरलेल्या शेतकरी पुतळाचा परिसर बळकावण्यासाठी रातोरात उद्ध्वस्त करण्यात आला. ‘लोकमत’ने याचे वृत्त

बारामती : बारामतीकरांचे आकर्षण ठरलेल्या शेतकरी पुतळाचा परिसर बळकावण्यासाठी रातोरात उद्ध्वस्त करण्यात आला. ‘लोकमत’ने याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज त्याचे पडसाद उमटले. ज्यांनी पुतळा उद्ध्वस्त केला, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर त्याच जागेवर शेतकरी पुतळा तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली. नगरपालिकेच्या जागेवर १९७१ साली लायन्स क्लबने शेतकरी उद्यान उभारले होते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून उसाची मोळी घेऊन चाललेला पुतळा उभारण्यात आला होता.या संदर्भात आज शेतकरी कृती समितीचे नेते रंजनकाका तावरे, विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, शिवसंग्रामचे महेंद्र तावरे, भाजपाचे कुलभूषण कोकरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, सामाजिक कार्यकर्ते शाकीर बागवान, भाजप अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष आसिफ खान, शिवसेनेचे उपप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र काळे आदींनी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना पुतळा तोडल्या प्रकरणी जाब विचारला. या प्रकरणी रितसर संबंधित समाजकंटकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच, त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारावा, नगरपालिकेने पुतळा न उभारल्यास सर्व पक्षांच्या वतीने नगरपालिकेस शेतकरी पुतळा भेट देण्यात येणार आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना रंजन तावरे म्हणाले, शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बारामतीतच शेतकरी पुतळा तोडला जात आहे. ही बाब निषेधार्ह आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे. विरोधी नगरसेवक सुनिल सस्ते यांनी सांगितले की, पुतळ्याची पुर्नस्थापना नगरपालिकेने न केल्यास लोकवर्गणीतून त्याच ठिकाणी पुतळा बसविण्यात येईल. भाजपचे असिफ खान यांनी त्या परिसरात असलेल्या संस्थेला पुतळ्याची जागा बळकविण्यासाठी पुतळा पाडला आहे का, असा जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारला. भाजपचे शहराध्यक्ष नितिन भामे यांनी यापूर्वी पाण्याची टाकी पाडून जागा बळकावली आहे. नगरपालिकेने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तर रासपचे किशोर मासाळ यांनी पुतळ्याच्या बाबत तातडीने पुन्हा निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्यांना नगरपालिकेत काम करण्यापासून रोखले जाईल. तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.पुतळा पाडणे आणि उभारणे हे नगरसेवकांना विचारात न घेता कसे घडले, याचा जाब विचारण्यात आला. त्यासाठी पालिकेत ठराव केला आहे का, अशी विचारणा यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)