शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी स्वच्छता निम्मीच!

By admin | Updated: June 1, 2016 02:14 IST

शहरातील सर्व नाले, ड्रेनेजसफाई करण्याची ३१ मेची डेडलाइन संपून गेली तरी अद्याप सरासरी ५० टक्के कामे अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

पुणे : शहरातील सर्व नाले, ड्रेनेजसफाई करण्याची ३१ मेची डेडलाइन संपून गेली तरी अद्याप सरासरी ५० टक्के कामे अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे वस्त्या, झोपडपट्ट्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये ३१ मेपर्यंत प्रशासनाने पार पाडलेल्या पावसाळी कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील ४ झोनची माहिती प्रशासनाकडून या वेळी सादर करण्यात आली. त्यामध्ये अजून खूप कामे बाकी असल्याचे आढळून आले. स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके व इतर सदस्यांनी या प्रकाराचा जाब प्रशासनाला विचारला. येत्या आठवडाभरात ही कामे पूर्ण झाली नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी या वेळी स्पष्ट केले.झोन १ अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांनी ८४ हजार ९६५ मीटर पावसाळी लाइनपैकी ४० हजार ३८३ मीटरची स्वच्छता केली आहे. झोन क्रमांक २ मध्ये ९८ हजार २४६ पैकी केवळ १५ हजार १४५ मीटर लाइनची स्वच्छता केली. झोन ३ मधील ७२ हजार मीटर लाइनपैकी १४ हजार ६७५ लाइनची स्वच्छता करण्यात आली आहे. झोन ४ मधील कामांची स्थिती खूपच वाईट आहे. दरवर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातात. मात्र, ३१ मेची डेडलाइन संपली तरी अद्याप मोठ्या प्रमाणात कामे शिल्लक राहिली आहे. यंदा अनेक क्षेत्रीय कार्यालयांनी नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडरच काढण्यास खूप उशीर लावला.नाल्यांची परिस्थिती खूपच वाईट ४शहरामध्ये वारजे, शिवाजीनगर, प्रभात रोड, औंध, बावधन, कोथरूड, पाषाण, बाणेर, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी, हडपसर, कोंढवा, कोरेगाव पार्क, कॅम्प, मार्केट यार्ड, नवी पेठ, अलका चौक, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, धायरी या परिसरातून प्रमुख २७ नाले वाहतात. ४वर्षभर या नाल्यांमध्ये प्लास्टिक, राडारोडा व इतर विविध प्रकारचा कचरा अडकून पडलेला आहे. या नाल्यांची सफाई न झाल्यास पावसाळ्यामध्ये पाण्याचा मोठा प्रवाह नाल्यातून वाहू लागल्यानंतर पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाल्याच्या परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.