शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दैनंदिन वापरासाठी पावसाचे पाणी

By admin | Updated: June 1, 2016 00:55 IST

राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून त्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी ‘लोकमत’चा ‘जलमित्र अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे

पुणे : राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून त्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी ‘लोकमत’चा ‘जलमित्र अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत पुण्यातील धायरीमधील साईपूरम सोसायटीने या वर्षी जलपुनर्भरण (रेनवॉटर हार्वेस्टिंग ) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सोसायटीच्या पाच इमारतींच्या तब्बल ६० हजार चौरसफूट क्षेत्रावर पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी सोसायटीने तब्बल १५० फूट खोलीची एक बोअरवेल घेतली आहे. याशिवाय हे पाणी सोसायटीत अस्तित्वात असलेला एक बोअर आणि सुमारे २० हजार लिटरच्या साठवणूक टाकीत संकलित करण्यात येणार असून, दैनंदिन वापरासाठी या पाण्याचा उपयोग केला जाणार आहे. सोसायटीने घेतलेल्या पुढाकारामुळे वर्षाला तब्बल ४२ लाख लिटर पाणी भूगर्भात जिरविणे शक्य होणार आहे. शहरात महापालिकेने २००७ नंतरच्या सर्व इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने साईपूरम सोसायटीने यासाठी पुढाकार घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे. या धायरी येथे कैलास जीवन फॅक्टरीजवळ असलेल्या या सोसायटीमध्ये सुमारे ५ इमारती असून, प्रत्येक इमारतीचे छत जवळपास १५ हजार चौरस फुटांचे आहे. त्यामुळे या इमारतींवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठते. यापूर्वी हे पाणी सोसायटीकडून परिसरात असलेल्या नाल्यात सोडले जात होते. मात्र, राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याचे तसेच प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन लोकमतकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत साईपूरम सोसायटीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार, या पाच इमारतींमधील पाणी एका स्वतंत्र यंत्रणेद्वारे संकलित करून ते फिल्टरच्या माध्यमातून पुढे सोसायटीच्या दोन बोअरवेल आणि संकलन टाकीत सोडले जाणार आहे. ४२ लाख लिटर पाण्याची बचत शहरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता १ हजार चौरसफूट क्षेत्रात जवळपास ७0 हजार लिटर पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे भूगर्भात पोहोचविता येते. या सोसायटीच्या पाच इमारतींच्या छताचे क्षेत्रफळ हे तब्बल ६0 हजार चौरसफूट आहे. त्यामुळे सोसायटीकडून जवळपास ४२ लाख लिटर पाणी वाचविले जाणार आहे. शहरातील इतर सोसायट्यांसाठी साईपूरम सोसायटीचा हा उपक्रम निश्चितच एक आदर्श ठरणार आहे.