शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

पावसाची ओढ; शेतकरी हवालदिल

By admin | Updated: August 10, 2015 02:55 IST

पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या

काऱ्हाटी : पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, जिवापाड सांभाळलेली जनावरे कशी वाचवायची, या विचाराने शेतकरी चिंतेत पडला आहे. पावसाळ्यातच ‘जनाई शिरसाई’ योजनेतून बंधारे, पाझर तलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील काऱ्हाटी, माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार आदी गावांत खरीप हंगामात केलेली पेरणी वाया गेली. पेरणीचा खर्च, बी-बियाणे, खते, दिवसरात्र केलेली मेहनत वाया गेली आहे. जनावरांसाठी चारापिके घेता आली नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चांगले पाणी नसल्यामुळे क्षारयुक्त पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सततची पाणीटंचाई व दुष्काळ या भागातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली असल्याची खंत काऱ्हाटी येथील शेतकरी मधुकर जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. निरवांगी : निमसाखर (ता. इंदापूर) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना ३ ते ४ किलोमीटर अंतरावरून बेंद्रेवस्ती येथील हातपंपावर जावे लागत आहे. शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवण्यासाठी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. इंदापूरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी या गावातील पिण्याच्या पाण्याची त्वरित पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.निमसाखर गावची लोकसंख्या जवळपास ८ हजारापर्यंत आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर दगडवाडी येथे आहे. या विहिरीतील पाणी क्षारयुक्त आहे. हे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत नाहीत. या विहिरीतील पाण्याची पातळी अंत्यत कमी झाली आहे. हे पाणी आठ दिवसांतून फक्त एक तास येत आहे. त्यानंतर मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जे मिळेल पाणी तेच पाणी प्यावे लागत आहे.