शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

पावसाची दडी; पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:16 IST

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांचे नुकसान होत ...

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. यामुळे त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्ह्यात गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. या पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे पावसाच्या पाण्यावर आधारीत पिके सुकायला लागली आहेत. आंबेगाव, शिरूर, दाैंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, हवेली, जुन्नर, खेड, भोर, मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्यातील बहुतांश भागात पिकांचे नुकसान झाले आहे. पर्जन्यमानात झालेल्या खंडामुळे जिरायती बाजरी, बटाटा, उडीद, भुईमूग पिकाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे या बाबत कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.