शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

उत्पन्नवाढीसाठी रेल्वेचा 'शून्य'चा खेळ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे प्रशासन पुण्यासह देशातील विविध स्थानकावरून रेल्वे गाड्या सुरू करीत आहे. पण यंदाही रेल्वेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वे प्रशासन पुण्यासह देशातील विविध स्थानकावरून रेल्वे गाड्या सुरू करीत आहे. पण यंदाही रेल्वेने चालाखी केली. गाड्यांच्या सुरुवातीला 'शून्य' क्रमांक देउन त्यांनी गाड्यांना विशेष रेल्वेचा दर्जा दिला. परिणामी यंदाही प्रवाशांना सवलतीपासून मुकावे लागणार आहे. रेल्वेने उत्पन्न वाढीसाठी ही शक्कल लढवली आहे. मात्र याचा फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या रेल्वे प्रशासन आता पुन्हा सुरू करीत आहे. यात पुणे स्थानकावरून धावणाऱ्या यशवंतपूर-जयपूर, बंगळुरू-अजमेर, जोधपूर-बंगळुरू, गांधीधाम-बेंगळुरू, अजमेर- म्हैसूर, मुंबई-नागरकोईल आदी विशेष गाड्या २६ व २७ जूनपासून सुरू करीत आहे. या गाड्यांनादेखील विशेषचा दर्जा दिल्याने याला तिकीट दरात असलेल्या सर्व सवलती पुन्हा रद्द झाल्या आहेत.

--------------

आधी कोविड स्पेशल आता फेस्टिवल :

रेल्वेने कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोविड १९ स्पेशल दर्जाची रेल्वे देशभर चालविल्या. यानंतर हॉलिडे स्पेशल, आणि आता पुन्हा फेस्टिवल स्पेशल म्हणून सुरू करीत आहे. यात देखील प्रवाशांच्या सर्व सवलती रद्द झाल्या आहेत.

------------------

जवळपास ५३ प्रकारच्या सवलती /

रेल्वे प्रशासन सामान्य प्रवाशांना रेल्वे तिकीट दरात जवळपास ५३ प्रकारच्या सवलती देते. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांकरीता अर्धे तिकीट, अधिस्वीकृती धारक पत्रकार, दिव्यांग, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती, अंध व्यक्ती, भारत सरकारने दिलेले पुरस्कारप्राप्त व्यक्ती आदी घटकांचा समावेश आहे. रेल्वे प्रवासात २५ ते ७५ टक्के तर काही घटकांना १०० टक्के सवलत दिली जाते. या सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांना पूर्ण तिकीट दराने तिकीट काढावे लागते.

----------------

रेल्वे प्रशासनाने आता विशेष दर्जाच्या रेल्वे बंद करून पूर्वीसारख्या सामान्य दर्जाचे रेल्वे सुरू करायला हवी. यातून रेल्वेचा जरी फायदा होत असला तरीही सामान्य प्रवासी मात्र विनाकारण भरडला जात आहे. रेल्वेने आता फायद्याचा विचार न करता प्रवाशाचा विचार करावा.

हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे

--------------------

सध्या विशेष दर्जाच्या रेल्वे धावत आहे. त्यामुळे त्या रेल्वेला सवलती रद्द केल्या आहेत. जेव्हा सामान्य रेल्वे धावतील तेव्हा सवलती पुन्हा दिल्या जातील. रेल्वे बोर्ड याबाबतचा निर्णय घेईल.

-ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई