शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

रब्बी क्षेत्र यंदा ६० लाख हेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातले यंदाचे रब्बी क्षेत्र ६० लाख हेक्टर असेल. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणानुसार कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातले यंदाचे रब्बी क्षेत्र ६० लाख हेक्टर असेल. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणानुसार कृषी विभाग काम करत असून त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात शंभर सावता माळी रयत बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कृषी आयुक्तालयात भुसे यांनी मंगळवारी (दि. ७) राज्याच्या रब्बी हंगामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांनी माहिती दिली. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार आदी या वेळी उपस्थित होते.

भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या अर्थकारणात रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्यामुळेच कृषी विभागाने याकडे गंभीरपणे पाहावे. महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये अचूकता आली आहे. सर्व काही एकाच छताखाली आल्याने शेतकऱ्यांचा त्रास कमी झाला आहे.

सोयाबीन, कापूस, करडई ही राज्यातील प्रमुख पिके आहेत. त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या सहभागाने परिषदा घेण्यात येत असल्याचे भुसे म्हणाले. राज्यात ३५ हजार १०० सावता माळी रयत बाजार होणार आहेत. त्यापैकी १५ हजार २५१ सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना थेट खरेदीदारांबरोबर जोडून देण्यात येत आहे. द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट यांचा समावेश रोजगार हमी योजनेत केला असल्याचे भुमरे यांनी सांगितले.