शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

लोकसहभागातून सुटतील प्रश्न

By admin | Updated: February 21, 2017 02:35 IST

ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांची प्रगती योजनाबद्ध रितीने झालेली नाही. योजना व अंमलबजावणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे

तळेगाव दाभाडे : ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांची प्रगती योजनाबद्ध रितीने झालेली नाही. योजना व अंमलबजावणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे प्रश्न निर्माण होत आहेत. लोकसहभागाने बरेच प्रश्न सुटतील, असे मत डॉ. संजय कप्तान यांनी व्यक्त केले. मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात गुणवत्ता सुधार योजनेतंर्गत वाणिज्य विभागाच्या वतीने ‘ग्रामीण भागातील औद्योगिक विकासातील आव्हाने’ या  विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले  आहे. उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर बीजभाषक डॉ. एस. व्ही. कडव्हेकर , सत्राचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बाळसराफ, संस्थेचे उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे, प्रा. वसंत पवार व महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या स्नेहल बाळसराफ व प्रभारी प्राचार्य व चर्चासत्राचे आयोजक प्रा. श्रीकांत महाजन आदी उपस्थित होते. डॉ. कडव्हेकर म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात औद्योगिकीकरण वेगाने होऊ शकते. कारण तिथे विचारांचा भ्रष्टाचार तुलनेने कमी आहे. गरज  आहे व्यावसायिक दृष्टिकोन बाळगण्याची.’’ अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाळसराफ यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. नंतरच्या सत्रांमध्ये अर्चना आहेर, डॉ. अश्विनी सोवनी या प्रमुख वक्त्यांनी विचार मांडले. डॉ. जे. डी. टाकळकर व डॉ. ए. एम. अग्रवाल सत्राचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रा. श्रीकांत महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किसन पाटील व प्रा. अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनया केसकर यांनी आभार मानले. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी चर्चासत्राचे आयोजन केले.(वार्ताहर)