शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

कांद्यावरील करपा घालविण्यासाठी देशी दारूची मात्रा

By admin | Updated: September 18, 2015 01:12 IST

ढगाळ हवामानामुळे सध्या पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. औधांची फवागरणी करूनही काही उपयोग होत नसल्याने विशेषत: कांदा पिकावरील करपा घालविण्यासाठी

पळसदेव : ढगाळ हवामानामुळे सध्या पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे. औधांची फवागरणी करूनही काही उपयोग होत नसल्याने विशेषत: कांदा पिकावरील करपा घालविण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क देशी दारूची मात्रा देण्यास सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी रमेश धमाळ यांनी दारूमुळे कोणताही रोग अटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांनी असे प्रकार करू नयेत असे आवाहन केले आहे.गेल्या आठवडाभर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. मात्र सगळीकडे ढगाळ हवामान आहे. परिणामी उरल्या सुरल्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. डाळिंब असेल तर तेल्या, कांदा असेल तर करपा, केळी असेल तर चिकट्या रोग आढळून येत आहे. यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्याला महागडी औषधे विकत घेऊन, त्या त्या पिकांवर फवारणी करावी लागते. त्यातूनही पीक वाचेल की नाही, याबाबत शंका असते. सध्या कांदा पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय शोधला आहे. देशी दारूची कांद्यावर फवारणी करून करपा, मान मोडलेला कांदा यावर उपाय शोधला आहे. ‘देशी’ फवारा... अन् कांदा वाचवा’ अशीच चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ‘देशी’चा हा प्रयोग केला आहे. कांद्याला चांगला बाजारभाव आल्याने शेतकरीवर्ग कांदा पिकाकडे अधिक वळला आहे. त्यातच सध्याच्या काळात कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे कांदा काढून लगेचच विक्रीसाठी बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धनलाभ होत आहे, असे असताना पूर्वी लागवड केलेल्या कांद्यावर करपा रोग पडणे, माना खाली टाकणे, जळून जाणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे बी-बियाणे, खतांच्या दुकानात औषधे विकत घेण्यासाठी गर्दी होते. मात्र, एवढी महागडी औषधे फवारणी करूनही अनेक वेळा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी हा नवा पर्याय शोधला आहे. काही शेतकऱ्यांनी ‘देशी’चा प्रयोग केल्याने, इतर शेतकरीही या प्रयोगाचा अवलंब करीत आहेत. पाण्यामध्ये देशी दारूचे मिश्रण करून, त्या मिश्रणाची कांदा पिकावर फवारणी केली जात आहे. त्यामुळे याची चर्चा व केलेला प्रयोग अनेक शेतकरी एकमेकांना सांगू लागल्याने इतर शेतकरीदेखील हा प्रयोग करू लागले आहेत. (वार्ताहर)दारूची फवारणी स्वस्तात मस्त...पिकाच्या संरक्षणासाठी वापरली जात असल्याने देशी दारू पुन्हा चर्चेत आली आहे. याबाबत एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कांदा पिकावर देशी दारूची फवारणी केल्यास, कांदा पिकावरील सर्व रोग नष्ट होत आहेत. त्यामुळे इतर औषधांपेक्षा देशी दारूची फवारणी स्वस्तात मस्त आहे. तसेच, या फवारणीमुळे कांदा चांगला तरारत आहे, असे ही त्यांनी सांगितले.दारू फवारणी केल्याने कोणताही रोग आटोक्यात येत नाही. ढगाळ हवामान असल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र यासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधांचाच वापर केला पाहिजे. सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्याने औषधे फवारली तरी उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात व योग्य वेळी औषधांची फवारणी केली तर रोग नक्कीच आटोक्यात येतील.रमेश धुमाळकृषी अधिकारी, जिल्हा परिषद