शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळीत युरिया टाकल्याने कांदा सडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:14 IST

आधीच बाजारभाव कमी, त्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्याला मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. कांदा भरण्यासाठी कामगार आले असताना ...

आधीच बाजारभाव कमी, त्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्याला मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. कांदा भरण्यासाठी कामगार आले असताना हा प्रकार उघडकीस आला असून बांगर यांनी कांदाचाळीत जवळपास ३०० पिशवी कांदा साठवून ठेवला होता. त्यापैकी त्यांच्या चाळीच्या तीन कप्प्यांत म्हणजे १५० ते २०० पिशवी कांद्याचे नुकसान झाले असून, त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याविषयी बांगर बेल्हा येथील तलाठी कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता कार्यालय बंद होते. दरवर्षी उन्हाळी कांद्याचे भाव सप्टेंबरनंतर वाढीव भाव मिळतील या आशेने बरेचसे शेतकरी जमेल तशा परिस्थितीत चाळीत अथवा शेडमध्ये कांदा साठवून चांगला भाव मिळण्याच्या आशेने थांबलेले असतात. परंतु अशा खोडसाळपणामुळे शेतकरी नाउमेद होऊन नैराश्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकरी बांगर यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन गुन्हेगाराला योग्य शासन व्हावे, अशी मागणी केली असून, असाच प्रकार जवळच्या एका शेतकऱ्याच्या बाबतीतही घडला असून, कीटकनाशके फवारण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात तणनाशक टाकल्याने जवळपास दोन एकर कांदा जळून गेला होता, अशीही माहिती समोर येत आहे.

200821\img-20210820-wa0212.jpg

कां

कांदा चाळीतच सडलेला कांदा