शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:14 IST

मंचर : पुणे- नाशिक रेल्वेला भारतीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी देत प्रकल्पातील २० टक्के ...

मंचर : पुणे- नाशिक रेल्वेला भारतीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाला मंजुरी देत प्रकल्पातील २० टक्के म्हणजेच तीन हजार २०८ कोटी रुपये खर्चाचा वाटा उचलावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत प्रकल्पाला राज्याकडून ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून मी सातत्याने विविध स्तरावर पुणे-नाशिक रेल्वेसाठी पाठपुरावा केल्यानंतर २०१६ ला या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर राज्यातील प्रकल्पांच्या कार्यन्वयनासाठी महारेलची स्थापना झाली. याद्वारे राज्यातील पहिल्या तीन प्रकल्पांमध्ये तसेच ब्रिटिशकालीन रेल्वे बोर्डाच्या पिंकबुकमध्येही १६ हजार ३९ कोटी रुपये किमतीच्या हायस्पीड पुणे-नाशिक रेल्वेचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी द्यावी यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली व या प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच यासंबंधीची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही प्रक्रिया पुढे सहा-सात महिने लांबणीवर पडली.

गेली तीन महिने पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा पाठपुरावा सुरू केल्याने गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजीव कुमार, परिवहन विभागाचे सचिव आशिष कुमार सिंग, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या कृषी व औद्योगिक क्षेत्राला लाभदायक ठरणाऱ्या या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. लवकरच या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळून माझ्यासह या भागातील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा यावेळी शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.