शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

अधिकाऱ्यांना ठेवले डांबून

By admin | Updated: April 18, 2015 23:31 IST

धानेप (ता. वेल्हे) येथे कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्या गावठाण पुनर्वसनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना फै लावर घेत, धानेप येथील धरणग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले.

मार्गासनी : धानेप (ता. वेल्हे) येथे कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्या गावठाण पुनर्वसनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना फै लावर घेत, धानेप येथील धरणग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले. चार तासांनंतर अधिकाऱ्यांकडून लेखी घेतल्यानंतर, त्यांची सुटका करण्यात आली.१ एप्रिल रोजी धानेप गावातील संपादित जमिनीवर गुंजवणी धरणातील पूर्णत: कठीन, भोसलेवाडी, कानंद, कोदापूर यांचे गावठाण बसविण्यासाठी येथील संपादित शेतजमिनीचे प्लॉटिंग व सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांनीयाबाबत निवेदन देऊन काम थांबविले होते. या निवेदनामध्ये धानेप गावातील संपादित क्षेत्र हे बुडीत खाणीसाठी संपादित झालेले असून, ते पुनर्वसनासाठी पुन्हा घेऊ नये, खाणीसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या किमतीतून ६५ टक्के रक्कम शेतकरी कपात करून देत असतानाही शासनाने जमा करून घेतली नाही. त्यामुळे येथील धरणग्रस्त अपात्र ठरले. पात्र खातेदारांना अद्यापही जमिनी मिळाल्या नाहीत. धानेप गावातील प्रकल्पग्रस्तांचेच धानेप गावामध्ये पुनर्वसन व्हावे, इतर कोणत्याही गावाचे गावठाण धानेपमध्ये होऊ नये, अशा मागण्या या निवेदनामध्ये होत्या. या निवेदना संबंधीची चर्चा करण्यासाठी नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी. आर. पवार, उपविभागीय अभियंता भरत वायसे, सहायक अभियंता व्ही. डी. नलावडे, शाखा अभियंता बी. क े.ताम्हाणे यांना सुमारे ४ तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये थांबवून बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. यावेळी धरणग्रस्त सागर मळेकर, ज्ञानेश्वर ओव्हाळ, प्रताप मरळ, शंकर चाळेकर, मारुती चोर, विजय मळेकर, दिनकर गोविलकर, लक्ष्मण मळेकर, निवृत्ती ओव्हाळ, गणपत देवगिरीकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)४गुंजवणी धरणाच्या पात्रामध्ये येथील कुंभारवाडा गेला असून, तसेच धानेप गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून, अद्यापही येथील धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाही, गुंजवणी धरणामध्ये अशंत: कठीन बुडीत व पूर्णत: बुडीत अशी एकूण नऊ गावे असून, राजकारणामुळे व धरणाचे काम सुरू करण्याच्या हेतून फक्त बुडीत क्षेत्रांतील कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्याच पुनर्वसनाचा विचार केला जातो, इतर गावांतील धरगण्रस्तांचे काय? ४पुरंदरचे आमदार जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी येथील इतर धरणग्रस्तांना पुरंदरमधील गायराने द्यावीत, अन्यथा गुंजवणीच्या पाण्याचा विचार सोडावा, शेवटचा श्वास असेपर्यंत पुनर्वसन झाल्याशिवाय पुरंदरला पाण्याचा एकही थेंब जाऊ देणार नाही, असा इशारा मंत्र्यांना दिला होता. तर धरणाच्या कामासंबंधी व पुनर्वसनासंबंधीच्या सर्व अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका या मंत्रालयात न होता, त्या धरणक्षेत्रामध्ये घ्याव्या, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी अधिकाऱ्यांवर झाडल्या. ४अभियंता पवार यांनी फोनवरून प्रांताधिकारी संजय आसवले यांच्याशी संपर्क साधून, लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु, लेखी मागणीनुसार कोणताही अधिकार नसताना येथील धरणग्रस्तांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पवार यांनी प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी बैठका घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.