शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना ठेवले डांबून

By admin | Updated: April 18, 2015 23:31 IST

धानेप (ता. वेल्हे) येथे कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्या गावठाण पुनर्वसनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना फै लावर घेत, धानेप येथील धरणग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले.

मार्गासनी : धानेप (ता. वेल्हे) येथे कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्या गावठाण पुनर्वसनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना फै लावर घेत, धानेप येथील धरणग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले. चार तासांनंतर अधिकाऱ्यांकडून लेखी घेतल्यानंतर, त्यांची सुटका करण्यात आली.१ एप्रिल रोजी धानेप गावातील संपादित जमिनीवर गुंजवणी धरणातील पूर्णत: कठीन, भोसलेवाडी, कानंद, कोदापूर यांचे गावठाण बसविण्यासाठी येथील संपादित शेतजमिनीचे प्लॉटिंग व सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांनीयाबाबत निवेदन देऊन काम थांबविले होते. या निवेदनामध्ये धानेप गावातील संपादित क्षेत्र हे बुडीत खाणीसाठी संपादित झालेले असून, ते पुनर्वसनासाठी पुन्हा घेऊ नये, खाणीसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या किमतीतून ६५ टक्के रक्कम शेतकरी कपात करून देत असतानाही शासनाने जमा करून घेतली नाही. त्यामुळे येथील धरणग्रस्त अपात्र ठरले. पात्र खातेदारांना अद्यापही जमिनी मिळाल्या नाहीत. धानेप गावातील प्रकल्पग्रस्तांचेच धानेप गावामध्ये पुनर्वसन व्हावे, इतर कोणत्याही गावाचे गावठाण धानेपमध्ये होऊ नये, अशा मागण्या या निवेदनामध्ये होत्या. या निवेदना संबंधीची चर्चा करण्यासाठी नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी. आर. पवार, उपविभागीय अभियंता भरत वायसे, सहायक अभियंता व्ही. डी. नलावडे, शाखा अभियंता बी. क े.ताम्हाणे यांना सुमारे ४ तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये थांबवून बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. यावेळी धरणग्रस्त सागर मळेकर, ज्ञानेश्वर ओव्हाळ, प्रताप मरळ, शंकर चाळेकर, मारुती चोर, विजय मळेकर, दिनकर गोविलकर, लक्ष्मण मळेकर, निवृत्ती ओव्हाळ, गणपत देवगिरीकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)४गुंजवणी धरणाच्या पात्रामध्ये येथील कुंभारवाडा गेला असून, तसेच धानेप गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून, अद्यापही येथील धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाही, गुंजवणी धरणामध्ये अशंत: कठीन बुडीत व पूर्णत: बुडीत अशी एकूण नऊ गावे असून, राजकारणामुळे व धरणाचे काम सुरू करण्याच्या हेतून फक्त बुडीत क्षेत्रांतील कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्याच पुनर्वसनाचा विचार केला जातो, इतर गावांतील धरगण्रस्तांचे काय? ४पुरंदरचे आमदार जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी येथील इतर धरणग्रस्तांना पुरंदरमधील गायराने द्यावीत, अन्यथा गुंजवणीच्या पाण्याचा विचार सोडावा, शेवटचा श्वास असेपर्यंत पुनर्वसन झाल्याशिवाय पुरंदरला पाण्याचा एकही थेंब जाऊ देणार नाही, असा इशारा मंत्र्यांना दिला होता. तर धरणाच्या कामासंबंधी व पुनर्वसनासंबंधीच्या सर्व अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका या मंत्रालयात न होता, त्या धरणक्षेत्रामध्ये घ्याव्या, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी अधिकाऱ्यांवर झाडल्या. ४अभियंता पवार यांनी फोनवरून प्रांताधिकारी संजय आसवले यांच्याशी संपर्क साधून, लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु, लेखी मागणीनुसार कोणताही अधिकार नसताना येथील धरणग्रस्तांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पवार यांनी प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी बैठका घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.