शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

ब्रॅँडेड अन्नधान्यावर जीएसटीच्या विरोधात व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: May 25, 2017 02:53 IST

सर्व शेतीमाल जीएसटीमुक्त राहणार असल्याचे जाहीर करतानाच केंद्र शासनाने ब्रँडेड अन्नधान्यांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्व शेतीमाल जीएसटीमुक्त राहणार असल्याचे जाहीर करतानाच केंद्र शासनाने ब्रँडेड अन्नधान्यांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून सध्या बाजारपेठेत ९५ टक्के ब्रँडेड माल विकला जात असल्याने ही व्यापारी आणि नागरिकांची एक प्रकारे फसवणूक आहे. जर हा कर मागे घेतला नाही, तर एलबीटीपेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा पुण्यातील व्यापाऱ्यांनी ‘लोकमत व्यासपीठा’वरून दिला़जीएसटीमधील तरतुदींबाबत लोकमत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पूना मर्चंट चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी या कायद्यातील त्रुटी दाखवून दिल्या़ या वेळी पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, अजित सेटिया, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती उपस्थित होते़चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितले, की केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुंबईत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, तेव्हा अन्नधान्यावर कोणताही कर लावला जाणार नाही़ ज्या वस्तंूवर वॅट आहे, त्याच वस्तूंना जीएसटी लागेल, असे सांगितले होते़ प्रत्यक्षात अन्नधान्याला जीएसटीतून वगळल्याची घोषणा करताना त्याखाली कायद्यात ब्रँडेड मालाला ५ टक्के जीएसटी लागू केला आहे़ ही तरतूद अन्यायकारक असून, प्रामाणिक व्यावसायिकांना त्रासदायक आहे़ एकच वस्तू बँ्रडमध्ये असल्यास त्यावर जीएसटी आकारणी, तर तीच वस्तू ब्रँड नसेल तर त्यावर जीएसटी नाही़ यासारख्या तरतुदीमुळे शासनाला जीएसटीपासून मिळणारा महसूल तर मिळणार नाहीच; परंतु विनाकारण वेगवेगळ्या मार्गांनी जीएसटी कसा चुकवावा, यावर भर दिला जाईल़ चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती आणि पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले, की जीवनाश्यक वस्तूंमध्ये भेसळ होऊ नये, म्हणून कायदा करण्यात आला आहे़ त्यामुळे या वस्तू आता पॅकबंद स्वरूपात विकल्या जातात़ त्यामुळे त्यांच्यावर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे़ त्यातून महागाई वाढेल़ साखर, बेदाणा यासारख्या वस्तूंवरही आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे़ त्यामुळे सर्व प्रकारच्या जीवनाश्यक वस्तू, मग त्या बँ्रडेड असल्या तरी त्यांना जीएसटीमधून सूट मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे़केंद्र शासनाने याबाबत आवश्यक ती पावले न उचलल्यास नाइलाजाने व्यापाऱ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल़ यापूर्वी एलबीटीच्या विरोधात ज्याप्रमाणे आंदोलने झाली, त्यापेक्षा या आंदोलनाची व्याप्ती कितीतरी अधिक असू शकेल़