शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

आळंदीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:11 IST

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले ...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले आहे. मात्र लाखो रुपये खर्चूनही आळंदीकरांना पिण्यासाठी हक्काचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. मागील काही दिवसांपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना स्वच्छ पाण्याऐवजी गढूळ मलमिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे स्थानिकांना पिण्यासाठी विकत पाणी खरेदी करण्याची वेळ ओढवली आहे.

आळंदी शहराला दररोज ५० ते ६० लाख लिटर स्वच्छ पाण्याची गरज आहे. शहरात स्वच्छ पाणी वितरीत करण्यासाठी इंद्रायणी नदीलगत वाॅटरप्रूप जलशुद्धीकरण केंद्र आहे. सध्या मात्र जलशुद्धीकरण केंद्रातून नळाद्वारे मलमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाद्वारे प्राप्त झालेल्या या पाण्याचा कुबट वास येत असून ते पिण्यायोग्य नसल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, मागील आठ दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी विकत जार आणावे लागत आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

“ नळाद्वारे गढूळ पाणी वितरीत केले जात असल्यामुळे आम्हा नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. या पाण्याचा उग्र वास येत असून अतिशय गढूळ पाणी आहे. परिणामी जुलाब, उलट्या, साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.

- संदीप नाईकरे, नागरिक

फोटो ओळ : हा घ्या पुरावा... आळंदीत रविवारी (दि.१७) नळाद्वारे वितरित झालेले काळेकुट्ट पाणी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)