शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

आळंदीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:11 IST

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले ...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले आहे. मात्र लाखो रुपये खर्चूनही आळंदीकरांना पिण्यासाठी हक्काचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. मागील काही दिवसांपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना स्वच्छ पाण्याऐवजी गढूळ मलमिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे स्थानिकांना पिण्यासाठी विकत पाणी खरेदी करण्याची वेळ ओढवली आहे.

आळंदी शहराला दररोज ५० ते ६० लाख लिटर स्वच्छ पाण्याची गरज आहे. शहरात स्वच्छ पाणी वितरीत करण्यासाठी इंद्रायणी नदीलगत वाॅटरप्रूप जलशुद्धीकरण केंद्र आहे. सध्या मात्र जलशुद्धीकरण केंद्रातून नळाद्वारे मलमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाद्वारे प्राप्त झालेल्या या पाण्याचा कुबट वास येत असून ते पिण्यायोग्य नसल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, मागील आठ दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी विकत जार आणावे लागत आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

“ नळाद्वारे गढूळ पाणी वितरीत केले जात असल्यामुळे आम्हा नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. या पाण्याचा उग्र वास येत असून अतिशय गढूळ पाणी आहे. परिणामी जुलाब, उलट्या, साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.

- संदीप नाईकरे, नागरिक

फोटो ओळ : हा घ्या पुरावा... आळंदीत रविवारी (दि.१७) नळाद्वारे वितरित झालेले काळेकुट्ट पाणी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)