शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

पुणेकरांची पसंती पुरोगामी विचारांनाच

By admin | Updated: February 16, 2017 03:33 IST

पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सन २००७ मध्ये अगदी पहिल्यांदा सत्ता आली त्या वेळी मी पक्षाचा शहराध्यक्ष होतो. त्यानंतरची ५ वर्षे

पुणे : पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सन २००७ मध्ये अगदी पहिल्यांदा सत्ता आली त्या वेळी मी पक्षाचा शहराध्यक्ष होतो. त्यानंतरची ५ वर्षे आम्ही अनेक विकासकामे केली. त्यामुळेच पुणेकरांनी पुन्हा सन २०१२ मध्ये सत्ता दिली. आता गेल्या ५ वर्षांच्या कामांच्या बळावर आम्ही पुन्हा एकदा पुणेकरांसमोर आहोत, तेही केलेल्या कामांच्या बळावरच व पुणेकर पुन्हा आम्हालाच पहिल्या क्रमांकाची पसंती देतील, असा माझा विश्वास आहे.राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. काँग्रेसची पुढची पायरी असे मी म्हणेल. आयटीसारख्या अत्याधुनिक क्षेत्राचा पुण्यात विकास व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले, ही एकच गोष्ट आम्ही आधुनिक विचारांचे आहोत हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. अनेक युवकांना यामुळे रोजगार मिळाला. बाहेरून अनेक युवक पुण्यात आले व त्यांनी आपले आयुष्य घडविले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा हा दृष्टिकोनच लाखो मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी उपयोगी पडतो आहे.महापालिकेची निवडणूक स्थानिक विषयांवर लढली जाते हे खरे आहे. मात्र, पुण्यासारख्या शहराला जगाच्या नकाशावर न्यायचे असेल तर विचारही तसेच असावे लागतात. ते राष्ट्रवादी काँग्रेसने दाखविले. महापालिकेतील सत्ता जनहितासाठीच राबविली गेली. त्यामुळेच जुन्या पुण्याचा चेहरा गेल्या १० वर्षांत बदलला. केंद्र सरकार तसेच जगातील अनेक देशांमध्ये पुणे शहराचे नाव अग्रभागी असते ते आम्ही केलेल्या विकासकामांमुळेच, असा माझा दावा आहे. भाजपाने आमच्या प्रत्येक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आमचे विचार स्वच्छ असल्यानेच आम्ही मागे हटलो नाही. महापालिकेतील नेतृत्वाला पक्षातील नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्या अडथळ्यांचा काही उपयोग झाला नाही.जगाच्या आजच्या स्थितीत धर्मवादी, पंथवादी, जातवादी विचार कालबाह्य झाले आहेत असे मला वाटते. या प्रतिगामी विचारांवर चालणाऱ्या पक्षांना सत्ता मिळाली तर पुण्याचे नुकसान होईल. त्यामुळे आम्ही काँग्रेस या समविचारी पक्षाबरोबर आघाडी केली आहे. त्यामुळे आता मतांचे विभाजन होणार नाही व त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल, असे मला वाटते. सत्तेच्या गेल्या १० वर्षांच्या काळात शहरामध्ये विविध विकासकामे झाली. मूलभूत सुविधा, भविष्यातील समस्या यांचा वेध घेत सध्याची विकासकामे केली जातात. असा दृष्टिकोन सत्तेच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवला आहे. त्याला पुणेकरांची साथ मिळेल, असा मला विश्वास आहे.