शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना मिळणार २४ तास समान पाणी

By admin | Updated: May 23, 2015 00:36 IST

महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या समान पाणीवाटपाच्या २ हजार ८१८ कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मुख्य सभेत एकमताने मान्यता देण्यात आली.

पुणे : शहराला २४ तास आणि समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या समान पाणीवाटपाच्या २ हजार ८१८ कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मुख्य सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. या योजनेस केंद्रशासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेतून निधी मिळेल, असे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, केंद्रशासनाने जेएनएनयूआरएम योजना बंद केल्याने आता हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. शहराची २०४७ ची लोकसंख्या गृहीत धरून हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ४शहरात तीन लाख मीटर बसविणार ४ शहराची पाणी प्रक्रिया क्षमता २००० एमएलडी प्रतिदिन (सध्याची क्षमता १३६० एमएलडी इतकी आहे.)४४ हजार किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे नवीन जाळे४शहरासाठी १९.५० टीएमसी पाणी घेणार ४१०३ नवीन टाक्या बांधणार ४१६१ झोनद्वारे पाणीपुरवठा ४३२८ विभागीय झोन अ) नवीन पाच पाणी टाक्या २९३ कोटी १० लाख ब) तीन टाक्यांची पुनर्बांधणी २३ कोटी ७३ लाख क) जलशुद्धीकरण केंद्राची पुनर्बांधणी ५ कोटी ६६ लाख ड) पंपिग स्टेशन १४२ कोटी १३ लाख इ) पाणीवाटप आणि मीटर २ हजार १७७ कोटी शिफ्टिंगची कामे ५ कोटी ३० लाख विविध परवाने ५० लाख सल्लागार शुल्क २७ कोटी १० लाख आयत्यावेळचा खर्च ८१ कोटी ३० लाख एकूण खर्च २ हजार ८१८ कोटी ४६ लाखहा प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा आहे. जेएनएनयूआरएम योजना बंद झाली आहे. मात्र, केंद्राने नुकतीच स्मार्ट सिटी योजना जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्य सभेने या आराखड्यास मान्यता दिल्यास तो स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केंद्राकडे तत्काळ पाठविता येईल. तसेच या योजनेच्या अटी आणि शर्ती तसेच खर्चाच्या तपशिलाचा आराखडा मुख्य सभेत मान्यता घेऊनच पुढे पाठविला जाईल. त्यामुळे मुख्य सभेची तत्काळ मान्यता आवश्यक होती. - कुणाल कुमार, महापालिका आयुक्त४या योजनेत शहरातील सर्व मीटर महापालिका बसविणार आहे. त्यानुसार, प्रतिमीटर सात हजार रुपयांप्रमाणे जवळपास तीन लाख मीटरसाठी २१० कोटी रुपयांचा खर्चही महापालिकेस सोसावा लागणार आहे. त्यामुळे मीटरसाठीच्या खर्चाबाबत नंतर निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी काही नगरसेवकांनी केली. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने हा खर्च पालिकेस उचलावा लागणार आहे.कोटी या योजनेचा खर्च आहे. या योजनेंर्तगत शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी मीटर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास तीन लाख मीटर लागणार आहेत. त्याचबरोबर अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांची गळती शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच जलकेंद्रांची संख्या वाढविणे, पाण्याच्या नवीन टाक्या बांधणे अशी कामे या योजनेंतर्गत होणार आहे. पाच वर्षांत ही योजना राबविली जाणार असून, अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद केली जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतही हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.