शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीस बंद! वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पुणे-सोलापूर महामार्गावर आल्याने निर्माण झालेल्या समस्येने गंभीर स्वरूप ...

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पुणे-सोलापूर महामार्गावर आल्याने निर्माण झालेल्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील पाच किलोमीटर वाहतूक बंद करून सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे.

याबाबत होणाऱ्या समस्येमुळे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मंगळवार (दि.१) रोजी कुरकुंभ येथे बाधित क्षेत्राला भेट देऊन महामार्गावरील साचलेल्या पाण्याचा आढावा घेतला व दूषित पाणी त्वरित उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या तरी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे.

प्रदूषित पाण्यावर तहसीलदार संजय पाटील यांनी आढावा बैठक घेऊन दिलेल्या आदेशावर सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने तात्पुरती स्वरुपाची कारवाई करीत दूषित पाणी उचलण्याचे सोंग केले. मात्र, एका पावसाने या सर्व प्रकारावर पाणी फेरले आहे. दरम्यान, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दोन दिवसांत पाणी उचलून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले जरी असले, तरी मात्र याचा तत्सम तंत्रणेवर कितपत परिणाम होतो आहे हे पाहणे आवश्यक आहे. या प्रदूषित पाण्याने बाधित शेतकऱ्यांनी पाणी अडवण्याची तटस्थ भूमिका घेतल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. कुरकुंभ येथील प्रकल्पातून निघणारे दूषित पाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करण्यासाठी सोडले जाते. मात्र, याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दूषित पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा आरोप होत आहे.याच प्रक्रिया केंद्रातील पाणी जवळच्या रोटी वनविभागात सोडण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावर वरिष्ठांकडे निर्णय घेतला जात नसल्याचे कारण पुढे केले जात असून तूर्तास पाण्यावर प्रक्रिया न करताच सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

प्रदूषण मंडळाची हतबलता_

सामाईक सांडपाणी केंद्रात पाणी न सोडता उघड्यावर पाणी सोडणाऱ्या प्रकल्पधारकांवर व सामाईक सांडपाणी केंद्रावर कारवाई करण्याचे धाडस प्रदूषण मंडळाकडून दाखवले जात नसल्याने समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पाणी कुठून येते, ह्या प्रश्नावर काहीच उत्तर नसल्याने अधिकाऱ्यांची हतबलता दिसून येते.

शॉर्टकट ठरतोय जीवघेणा_____

कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील महामार्ग बंद केला असल्याने परिसरातील कामगार व ग्रामस्थ महामार्गावरील बंद केलेल्या रस्तादुभाजकाचा वापर करू लागले आहेत, यामध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी चौकात महामार्ग प्रशासनाने सुरक्षारक्षक ठेवले असून, त्यांनादेखील कोणी जुमानत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सध्यातरी शॉर्टकट जीवघेणा ठरतोय असंच दिसून येते आहे.