शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभ येथे पुणे-सोलापूर महामार्ग वाहतुकीस बंद! वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पुणे-सोलापूर महामार्गावर आल्याने निर्माण झालेल्या समस्येने गंभीर स्वरूप ...

कुरकुंभ : कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पातील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात पुणे-सोलापूर महामार्गावर आल्याने निर्माण झालेल्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील पाच किलोमीटर वाहतूक बंद करून सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे.

याबाबत होणाऱ्या समस्येमुळे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मंगळवार (दि.१) रोजी कुरकुंभ येथे बाधित क्षेत्राला भेट देऊन महामार्गावरील साचलेल्या पाण्याचा आढावा घेतला व दूषित पाणी त्वरित उचलण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या तरी परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे.

प्रदूषित पाण्यावर तहसीलदार संजय पाटील यांनी आढावा बैठक घेऊन दिलेल्या आदेशावर सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने तात्पुरती स्वरुपाची कारवाई करीत दूषित पाणी उचलण्याचे सोंग केले. मात्र, एका पावसाने या सर्व प्रकारावर पाणी फेरले आहे. दरम्यान, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दोन दिवसांत पाणी उचलून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले जरी असले, तरी मात्र याचा तत्सम तंत्रणेवर कितपत परिणाम होतो आहे हे पाहणे आवश्यक आहे. या प्रदूषित पाण्याने बाधित शेतकऱ्यांनी पाणी अडवण्याची तटस्थ भूमिका घेतल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. कुरकुंभ येथील प्रकल्पातून निघणारे दूषित पाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करण्यासाठी सोडले जाते. मात्र, याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दूषित पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याचा आरोप होत आहे.याच प्रक्रिया केंद्रातील पाणी जवळच्या रोटी वनविभागात सोडण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यावर वरिष्ठांकडे निर्णय घेतला जात नसल्याचे कारण पुढे केले जात असून तूर्तास पाण्यावर प्रक्रिया न करताच सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

प्रदूषण मंडळाची हतबलता_

सामाईक सांडपाणी केंद्रात पाणी न सोडता उघड्यावर पाणी सोडणाऱ्या प्रकल्पधारकांवर व सामाईक सांडपाणी केंद्रावर कारवाई करण्याचे धाडस प्रदूषण मंडळाकडून दाखवले जात नसल्याने समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पाणी कुठून येते, ह्या प्रश्नावर काहीच उत्तर नसल्याने अधिकाऱ्यांची हतबलता दिसून येते.

शॉर्टकट ठरतोय जीवघेणा_____

कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील महामार्ग बंद केला असल्याने परिसरातील कामगार व ग्रामस्थ महामार्गावरील बंद केलेल्या रस्तादुभाजकाचा वापर करू लागले आहेत, यामध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी चौकात महामार्ग प्रशासनाने सुरक्षारक्षक ठेवले असून, त्यांनादेखील कोणी जुमानत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सध्यातरी शॉर्टकट जीवघेणा ठरतोय असंच दिसून येते आहे.