शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

प्रकाशकांनी कल्पक मार्गाने वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा ...

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती आणि दिवाळी अंक पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी मनोहर मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते. प्रभावळकर यांनी माजगावकरांना मुलाखतीतून बोलते केले. प्रकाशन व्यवसायातील प्रवास, लेखकांच्या भेटीगाठी, वितरण व्यवस्था, विविध प्रकल्प यावर भाष्य करतानाच त्यांनी श्री. ग. माजगावकर, श्री. पु. भागवत यांच्या आठवणींना उजाळा दिला.

माजगावकर म्हणाले, ‘गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात समाजमाध्यमांची लक्षणीय पकड निर्माण झाली आहे. कोणत्याही माध्यमामध्ये जे सकस, टिकाऊ, जीवनदर्शन घडवणारे असेल तर ते लिखाण काळाच्या कसोटीवर टिकतेच. प्रकाशकांनाही सोशल मीडियातून नवे लेखक मिळतात. लेखन ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. इतर कलांप्रमाणे लेखनासाठीही रियाझ आवश्यक असतो. मेहनत घेतली नाही तर साहित्य तात्कालिक ठरते.’

--------------

कसे लिहायचे, भाषा कशी असावी, संदर्भ कसे शोधावेत, हे मला श्री. ग. माजगावकरंनी शिकवले. आकाशवाणीवर दुर्गाबाईंची मुलाखत घ्यायची होती. सुरुवातीला त्या तयार नव्हत्या. त्यानंतर प्रतिभाने मुलाखत घेतली तरच मी देईन, असे म्हणाल्या. मुलाखत झाल्यानंतर लिखाणासाठी दिलीप माजगावकर यांनी प्रेरणा दिली. कायम लिहिण्याचे प्रोत्साहन दिले.

- प्रतिभा रानडे

-------------------------

लेखक आणि प्रकाशकांमधील संबंध पूर्वीसारखे निखळ राहिलेले नाहीत. त्यांच्यातील वैचारिक मतभेदांचे मनभेदांमध्ये कधीच रूपांतर झाले नाही. निखळ संबंधांची परंपरा साहित्य व्यवहारात आता क्षीण होत चालली आहे. साहित्याच्या क्षेत्रातून कोत्या मनोवृत्तीला छेद द्यायला हवा.

- प्रा. मिलिंद जोशी

--------------------------------

दिलीप माजगावकर हे संपादक, लेखक, रसिक, प्रकाशक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. माझी श्रुतिकांची मालिका गाजली. मात्र, श्रुतिकांचे पुस्तक कोणी विकत घेत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या कथा तयार करा, असे माजगावकरांनी सांगितले. त्यानुसार मी लेखन केले आणि ‘बोक्या सातबंडे’चा जन्म झाला.

- दिलीप प्रभावळकर