शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशकांनी कल्पक मार्गाने वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा ...

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती आणि दिवाळी अंक पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी मनोहर मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे उपस्थित होते. प्रभावळकर यांनी माजगावकरांना मुलाखतीतून बोलते केले. प्रकाशन व्यवसायातील प्रवास, लेखकांच्या भेटीगाठी, वितरण व्यवस्था, विविध प्रकल्प यावर भाष्य करतानाच त्यांनी श्री. ग. माजगावकर, श्री. पु. भागवत यांच्या आठवणींना उजाळा दिला.

माजगावकर म्हणाले, ‘गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात समाजमाध्यमांची लक्षणीय पकड निर्माण झाली आहे. कोणत्याही माध्यमामध्ये जे सकस, टिकाऊ, जीवनदर्शन घडवणारे असेल तर ते लिखाण काळाच्या कसोटीवर टिकतेच. प्रकाशकांनाही सोशल मीडियातून नवे लेखक मिळतात. लेखन ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. इतर कलांप्रमाणे लेखनासाठीही रियाझ आवश्यक असतो. मेहनत घेतली नाही तर साहित्य तात्कालिक ठरते.’

--------------

कसे लिहायचे, भाषा कशी असावी, संदर्भ कसे शोधावेत, हे मला श्री. ग. माजगावकरंनी शिकवले. आकाशवाणीवर दुर्गाबाईंची मुलाखत घ्यायची होती. सुरुवातीला त्या तयार नव्हत्या. त्यानंतर प्रतिभाने मुलाखत घेतली तरच मी देईन, असे म्हणाल्या. मुलाखत झाल्यानंतर लिखाणासाठी दिलीप माजगावकर यांनी प्रेरणा दिली. कायम लिहिण्याचे प्रोत्साहन दिले.

- प्रतिभा रानडे

-------------------------

लेखक आणि प्रकाशकांमधील संबंध पूर्वीसारखे निखळ राहिलेले नाहीत. त्यांच्यातील वैचारिक मतभेदांचे मनभेदांमध्ये कधीच रूपांतर झाले नाही. निखळ संबंधांची परंपरा साहित्य व्यवहारात आता क्षीण होत चालली आहे. साहित्याच्या क्षेत्रातून कोत्या मनोवृत्तीला छेद द्यायला हवा.

- प्रा. मिलिंद जोशी

--------------------------------

दिलीप माजगावकर हे संपादक, लेखक, रसिक, प्रकाशक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. माझी श्रुतिकांची मालिका गाजली. मात्र, श्रुतिकांचे पुस्तक कोणी विकत घेत नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्या कथा तयार करा, असे माजगावकरांनी सांगितले. त्यानुसार मी लेखन केले आणि ‘बोक्या सातबंडे’चा जन्म झाला.

- दिलीप प्रभावळकर