शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांच्या स्वायत्ततेवर गदा येईल

By admin | Updated: March 29, 2017 23:54 IST

केंद्र सरकार आणि विधी आयोग अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करणारे विधेयक संसदेत सादर करीत आहेत़ या

केंद्र सरकार आणि विधी आयोग अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करणारे विधेयक संसदेत सादर करीत आहेत़ या बिलातील अनेक तरतुदींमुळे वकिलांची स्वतंत्र व्यवसाय करण्याची स्वायत्तता धोक्यात येणार आहे़ आजवर बार कौन्सिल आॅफ इंडिया देशभरातील वकिलांसाठी नियम आणि नियंत्रण ठेवत आली आहे़ वकिलांवर नियंत्रण ठेवण्याचे काम आजवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने समर्थपणे केले असताना त्यात बदल करण्याची काहीही गरज नसल्याचे बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र, गोवाचे माजी अध्यक्ष व सदस्य अ‍ॅड़ हर्षद निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़अ‍ॅड़ निंबाळकर म्हणाले, बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या अध्यक्ष व सदस्यांकडून देशभरातील राज्यांच्या शाखांमार्फत वकिलांसाठी नियम केले जातात़ तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येते़ चुकीचे काम करणाऱ्या वकिलांवर योग्य ती कारवाईही केली जाते़ असे असताना केंद्र सरकार आणि विधी आयोगाने अ‍ॅडव्होक्ट अ‍ॅक्ट १९६१ मध्ये दुरुस्ती आणणारे विधेयक आणले आहे़ या बिलामधील अनेक तरतुदी वकिलांसाठी जाचक ठरणार असून त्यामुळे त्यांना तणावरहित व पक्षकारांची बाजू अधिक चांगल्या प्रकारे मांडण्यात अडचणी येणार आहेत़ वकिलांना व्यवसाय करत असताना अनेकदा बाजू मांडण्यावरून पक्षकारांशी वादविवाद होतात़ अनेकदा कायद्यातील तरतुदी माहिती नसल्याने आपला वकिल आपली बाजू जोरदारपणे मांडत नाही, असा ग्रह पक्षकाराचा होऊ शकतो़ त्यावरुन पक्षकार त्याच्या वकिलाविरुद्ध या तरतुदीनुसार ते प्रोफेशनल मिसकंडक्ट होऊ शकेल़ पक्षकाराला एखाद्या वकिलाचे काम आवडले नाही तर, तो लगेच त्या वकिलाविरुद्ध तक्रार करू शकतो़ निर्भय व तणावरहित वातावरणात वकिल काम करु शकले तरच ते पक्षकाराला बाजू मांडून त्याला न्याय मिळवून देऊ शकतील़ पण, अशा प्रकारच्या तरतुदीमुळे त्यांच्यावर कायम टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे़न्यायालयात काम करीत असताना अनेकदा न्यायाधीश आणि वकिल यांच्यात मतभेद होत असतात़ खरं तर पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी असे मतभेद असणे हे न्यायाच्या दृष्टीने चांगले आहे़ पण, या नव्या तरतुदीमुळे न्यायाधीश अशा वकिलांविरुद्ध कंटेम्ट आॅफ कोर्ट करु शकतो़ बार कौन्सिल आॅफ इंडिया या आपल्या सदस्यांच्या मंडळामार्फत देशभरातील वकिलांवर नियंत्रण ठेवत असते़ त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या समित्या आहेत़ वकिलांविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी बार कौन्सिलची स्वत:ची ३ सदस्यांची डिसिप्लिनरी कमिटी असते़ त्यात तक्रार करणाऱ्याचे मत ऐकून घेऊन त्याची रीतसर सुनावणी होऊन दोषी असल्यास वकिलांवर कारवाईही केली जाते़ या नव्या तरतुदीमध्ये अशासाठी ५ जणांची कमिटी सुचविण्यात आली आहे़ त्यात २ सरकारचे प्रतिनिधी, २ निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि एक वकील प्रतिनिधी असणार आहे़ बार कौन्सिलची स्वत:ची कमिटी सक्षमपणे काम करीत असताना सरकारने अशा प्रकारे लुडबुड करण्याची आवश्यकता नाही़ बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या कमिटीवर सर्व वकिलांचे प्रतिनिधी असतात़ त्यावर आता सरकारचे ८ प्रतिनिधी घेण्याची तरतूद या दुरुस्तीमध्ये आहे़ एक प्रकारे बार कौन्सिलच्या कामकाजात सरकारचा हा हस्तक्षेपच आहे़ त्यामुळे अशा या तरतुदींना आमचा विरोध आहे़ बोगस वकिलांचा शोध घेण्यासाठी बार कौन्सिल आॅफ इंडियाने व्हेरिफिकेशनचा नियम आणला आहे़ त्याची सर्व राज्य शाखांमार्फत अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे़ आजपर्यंत बार कौन्सिल स्वायत्तपणे वकिलांसाठी काम करीत असून त्यांच्यासाठी नियमन करणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आली आहे़ यापुढेही ते करण्यासाठी बार कौन्सिल सक्षम असताना सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही़ या नव्या तरतुदीमुळे वकील नेहमीच तणावाखाली राहण्याची शक्यता आहे़ त्यामुळेच देशभरातून त्याला विरोध होत आहे़ (प्रतिनिधी)