शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

वकिलांच्या स्वायत्ततेवर गदा येईल

By admin | Updated: March 29, 2017 23:54 IST

केंद्र सरकार आणि विधी आयोग अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करणारे विधेयक संसदेत सादर करीत आहेत़ या

केंद्र सरकार आणि विधी आयोग अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करणारे विधेयक संसदेत सादर करीत आहेत़ या बिलातील अनेक तरतुदींमुळे वकिलांची स्वतंत्र व्यवसाय करण्याची स्वायत्तता धोक्यात येणार आहे़ आजवर बार कौन्सिल आॅफ इंडिया देशभरातील वकिलांसाठी नियम आणि नियंत्रण ठेवत आली आहे़ वकिलांवर नियंत्रण ठेवण्याचे काम आजवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने समर्थपणे केले असताना त्यात बदल करण्याची काहीही गरज नसल्याचे बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र, गोवाचे माजी अध्यक्ष व सदस्य अ‍ॅड़ हर्षद निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़अ‍ॅड़ निंबाळकर म्हणाले, बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या अध्यक्ष व सदस्यांकडून देशभरातील राज्यांच्या शाखांमार्फत वकिलांसाठी नियम केले जातात़ तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येते़ चुकीचे काम करणाऱ्या वकिलांवर योग्य ती कारवाईही केली जाते़ असे असताना केंद्र सरकार आणि विधी आयोगाने अ‍ॅडव्होक्ट अ‍ॅक्ट १९६१ मध्ये दुरुस्ती आणणारे विधेयक आणले आहे़ या बिलामधील अनेक तरतुदी वकिलांसाठी जाचक ठरणार असून त्यामुळे त्यांना तणावरहित व पक्षकारांची बाजू अधिक चांगल्या प्रकारे मांडण्यात अडचणी येणार आहेत़ वकिलांना व्यवसाय करत असताना अनेकदा बाजू मांडण्यावरून पक्षकारांशी वादविवाद होतात़ अनेकदा कायद्यातील तरतुदी माहिती नसल्याने आपला वकिल आपली बाजू जोरदारपणे मांडत नाही, असा ग्रह पक्षकाराचा होऊ शकतो़ त्यावरुन पक्षकार त्याच्या वकिलाविरुद्ध या तरतुदीनुसार ते प्रोफेशनल मिसकंडक्ट होऊ शकेल़ पक्षकाराला एखाद्या वकिलाचे काम आवडले नाही तर, तो लगेच त्या वकिलाविरुद्ध तक्रार करू शकतो़ निर्भय व तणावरहित वातावरणात वकिल काम करु शकले तरच ते पक्षकाराला बाजू मांडून त्याला न्याय मिळवून देऊ शकतील़ पण, अशा प्रकारच्या तरतुदीमुळे त्यांच्यावर कायम टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे़न्यायालयात काम करीत असताना अनेकदा न्यायाधीश आणि वकिल यांच्यात मतभेद होत असतात़ खरं तर पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी असे मतभेद असणे हे न्यायाच्या दृष्टीने चांगले आहे़ पण, या नव्या तरतुदीमुळे न्यायाधीश अशा वकिलांविरुद्ध कंटेम्ट आॅफ कोर्ट करु शकतो़ बार कौन्सिल आॅफ इंडिया या आपल्या सदस्यांच्या मंडळामार्फत देशभरातील वकिलांवर नियंत्रण ठेवत असते़ त्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या समित्या आहेत़ वकिलांविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी बार कौन्सिलची स्वत:ची ३ सदस्यांची डिसिप्लिनरी कमिटी असते़ त्यात तक्रार करणाऱ्याचे मत ऐकून घेऊन त्याची रीतसर सुनावणी होऊन दोषी असल्यास वकिलांवर कारवाईही केली जाते़ या नव्या तरतुदीमध्ये अशासाठी ५ जणांची कमिटी सुचविण्यात आली आहे़ त्यात २ सरकारचे प्रतिनिधी, २ निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि एक वकील प्रतिनिधी असणार आहे़ बार कौन्सिलची स्वत:ची कमिटी सक्षमपणे काम करीत असताना सरकारने अशा प्रकारे लुडबुड करण्याची आवश्यकता नाही़ बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या कमिटीवर सर्व वकिलांचे प्रतिनिधी असतात़ त्यावर आता सरकारचे ८ प्रतिनिधी घेण्याची तरतूद या दुरुस्तीमध्ये आहे़ एक प्रकारे बार कौन्सिलच्या कामकाजात सरकारचा हा हस्तक्षेपच आहे़ त्यामुळे अशा या तरतुदींना आमचा विरोध आहे़ बोगस वकिलांचा शोध घेण्यासाठी बार कौन्सिल आॅफ इंडियाने व्हेरिफिकेशनचा नियम आणला आहे़ त्याची सर्व राज्य शाखांमार्फत अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे़ आजपर्यंत बार कौन्सिल स्वायत्तपणे वकिलांसाठी काम करीत असून त्यांच्यासाठी नियमन करणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत आली आहे़ यापुढेही ते करण्यासाठी बार कौन्सिल सक्षम असताना सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही़ या नव्या तरतुदीमुळे वकील नेहमीच तणावाखाली राहण्याची शक्यता आहे़ त्यामुळेच देशभरातून त्याला विरोध होत आहे़ (प्रतिनिधी)