शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे खासगी कारखानदारीला प्रोत्साहन

By admin | Updated: March 22, 2015 23:05 IST

सभासदांचे भले करणार. कारखान्याच्या साखर विक्रीत घोटाळा, खासगी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे.

बारामती : साडेसात वर्षात उत्पादित साखरेसाठी गोडाऊन बांधता आले नाही, ते काय सभासदांचे भले करणार. कारखान्याच्या साखर विक्रीत घोटाळा, खासगी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे. सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढून शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त केले जात आहे. त्याला वेळीच माळेगावच्या सभासदांनी प्रतिबंध करा, असे आवाहन ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी केले.माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या मळद येथे आयोजित शेवटच्या सभेत ते बोलत होते. तावरे म्हणाले, ‘‘माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर स्वत:हून दूर होण्याचे मत शरद पवार यांना सांगितले. मात्र, त्यांच्या आणि अप्पासाहेब पवार यांच्या आग्रहास्तव पुन्हा अध्यक्ष झालो. मात्र, मोठ्या नेत्यांचा हा निर्णय छोट्या नेत्याला म्हणजे अजित पवार यांना आवडला नाही. त्यामुळे त्यांनी कुरघोड्या सुरू केल्या. मला ते सहन झाले नाही. राजीनामा देऊन दूर झालो. त्यानंतर १९९७ साली सर्व सभासदांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविली. बहुमताने निवडून दिले. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शिक्षण संस्थेसह विविध प्रकल्प हाती घेतले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यात सर्वाधिक दर त्या पाच वर्षात दिला. त्यावेळी देखील अन्य पक्षांच्या नेत्यांवर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला जाऊ नका, असा दबाव होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसह अन्य मंडळींच्या हस्ते विविध कार्यक्रम घेतले. खासगीकरणाला अजित पवार यांचेच प्रोत्साहन आहे. या कारखान्यामुळे सभासदांची मुले उच्च शिक्षित झाली. आमच्याकडील उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवारांच्या घरी जाऊन नोकरीचे आश्वासन दिले जात आहे. प्रशांत शिंदे या आमच्या उमेदवाराला घरी जाऊन आमिष दाखविले जाते. २०० रुपये रोजंदारीवर तो काम करत होता. १० वर्ष त्याला नोकरी मिळाली नाही. आता त्याला आमिष दाखवणं ही त्यांची नैतिकता आहे. पॅनलचे नेते रंजन तावरे म्हणाले, साखर विक्रीत घोटाळा झाला आहे. साखर कारखाने कर्जबाजारी करायचे, कमी दराने विकत घ्यायचे. खासगीकरणाचे स्वरूप या कारखान्यांना देण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी आहे. ऊस दरासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलने करायला लागली. खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे उसाला दर मिळाला. हे आमचे यशाचे फलीत आहे. साखर कारखानदारी भ्रष्टाचारमुक्त करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करताना ३८ गुन्हे दाखल झाले. तरी देखील आम्ही उसाला चांगला दर मिळवून दिल्याशिवाय शांत बसलो नाही. कारखान्याचा कारभार अनागोंदी आहे. माळेगाव कारखाना टिकविण्याचे काम सभासदांच्या हाती आहे. यावेळी पॅनलमधील उमेदवारांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)सध्या शरद पवार यांचा माळेगाव कारखाना आहे, असा सांगितले जाते. पण मागच्या साडेसात वर्षात एकदाही त्यांना मोळी पूजनासाठी बोलावले नाही. दरवर्षी साखर पोती भिजतात. ती ठराविक व्यापाऱ्यांना विकली जातात. त्यामध्ये घोटाळा आहे. छोटा नेता म्हणजे अजित पवार यांनी सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय होत नाही. मी अध्यक्ष असताना १ लाख ६० हजार पोत्यांच्या क्षमतेचे ३० दिवसात गोडावून बांधले. त्यानंतर एकही गोडावून बांधले नाही, असा यांचा कारभार आहे. - चंद्रराव तावरे, सहकार तज्ज्ञ