शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आॅडिट आक्षेपामुळे प्रकल्प अडचणीत

By admin | Updated: August 4, 2015 03:29 IST

महापालिकेने गेल्या दहा वर्षांत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पांची क्षमता शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा

पुणे : महापालिकेने गेल्या दहा वर्षांत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पांची क्षमता शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पांना मान्यता देण्याबाबतचा आक्षेप महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने घेतला असल्याने पालिकेकडून प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी उभारण्यात येणारे प्रकल्प अडचणीत आले आहेत.विशेष म्हणजे, हे प्रकल्प उभारण्याच्या अटीवर उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी महापालिकेला दिलेली ९ महिन्यांची मुदत ८ आॅक्टोबरला संपत असतानाच लेखापरीक्षणाच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, लेखा परीक्षणाच्या अहवालात घेण्यात आलेल्या आक्षेपांची तातडीने पूर्तता करण्यात येणार असून, प्रकल्पांना विलंब होऊ देणार नसल्याचे महापालिका आयुक्त कुमार यांनी सोमवारी सांगितले.जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महापालिकेचा कचरा उरुळी देवाची येथील डेपोवर येऊ न देण्याचा निर्णय घेऊन ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते. या वेळी महापालिकेकडून शहरातील ओला कचरा शहरातच जिरविण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये २ ते ५ टनांचे प्रकल्प उभारण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार, पालिकेकडून असे प्रकल्प उभारण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, महापालिकेने ४६ टन क्षमतेच्या प्रकल्पाच्या कामांना मान्यता दिली असून, आणखी जवळपास तेवढ्याच क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. मात्र, लेखापरीक्षण विभागाने नवीन प्रकल्पांची आवश्यकता नसल्याचा आक्षेप घेतल्याने हे प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.