शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

व्यावसायिकांनी स्वतःहून फूटपाथ मोकळे करावेत : तेजश्री काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:14 IST

रविवारी, दि. १५ रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर काकडे यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पुढे बोलताना सरपंच काकडे म्हणाल्या ...

रविवारी, दि. १५ रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर काकडे यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पुढे बोलताना सरपंच काकडे म्हणाल्या की, नीरा शहरातील विविध समस्यांचे निराकरण लवकरच होणार असून, लोकांनी ग्रामपंचायत प्रशासनावर विश्वास ठेवत, अडचणी स्पष्टपणे मांडाव्यात असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौकादरम्यानचा रस्ता रुंदीकरण करताना दुतर्फा प्रशस्थ फूटपाथही करण्यात आले. मात्र, या फूटपाथवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. फूटपाथवरून चालणे हा नागरिकांचा अधिकारी आहे. तो नागरिकांना देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. त्यासाठी कडक धोरण अवलंबावे लागले, तर त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन गंभीर पावले उचलण्यास सक्षम आहे. आता हा रस्ता सुशोभीकरण करण्यात येत आहे, त्यासाठी या फूटपाथवर ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे लावली जात आहेत. नव्याने लावलेल्या झाडांना व्यावसायिकांनी पाणी घालावे व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.