शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर होणार प्रक्रिया

By admin | Updated: March 28, 2017 02:35 IST

येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग

बेल्हा : येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग या विद्याशाखेतील विद्यार्थी विनायक कांदळकर याने पर्यावरणपूरक असा एक प्रकल्प तयार केला आहे. साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर कमी खर्चात प्रक्रिया करणारा प्रकल्प असे या प्रकल्पाचे नाव आहे. नावाप्रमाणेच हा प्रकल्प अत्यंत कमी खर्चिक असा आहे.तिचा वापर करून साखर कारखान्यातून प्रक्रियेद्वारे निघणारा चोथा व त्याची झालेली राख, वाळलेल्या शेवग्याच्या शेंगेच्या बियांपासून तयार केलेली पावडर या सर्वांचे मिश्रण एका छोट्या टँकमध्ये ठेवलेल्या दूषित पाण्याबरोबर केले जाते. टँकमध्ये शेवाळ आणि दूषित पाणी यांचे मिश्रण १२ तास सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर व साखर कारखान्यातून प्रक्रियेद्वारे निघणारा चोथा व त्याची झालेली राख आणि वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांच्या बियांपासून तयार केलेली पावडर यांचे मिश्रण टँकमधील दूषित पाणी सूर्यप्रकाशात २४ तास ठेवल्यानंतर त्या दूषित पाण्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून आले. सूर्यप्रकाशामुळे या पाण्यामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले व त्यामध्ये घाण, कचरा कुजून तळाशी जाऊन बसतो. वर राहिलेले स्वच्छ पाणी शेतीसाठी व इतर कामासाठी आपण वापरू शकतो. कारखान्यातून निघणाऱ्या चोथ्यापासून निर्माण झालेली राख ही अत्यंत हानिकारक असते. राखेमध्ये असणारे सिलिका नावाचे मूलद्रव्य जर पाण्याच्या संपर्कात आले तर ते पाणी शरीराला घातकारक व अपायकारक ठरते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमाप्रमाणे कारखान्यातून निघणारे दूषित पाणी शेतीला वापरू शकत नाही. परंतु या प्रकल्पाद्वारे सदर शुद्धीकरण केलेले पाणी व त्याचे अहवाल महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणार असल्याचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रवीण सातपुते व प्रा. नितीन खाटमोडे, प्रा. महेश खोसे यांनी सांगितले आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी या विद्यार्थ्याने १५ संशोधन पेपरांचा अभ्यास करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्सचा अभ्यास केलेला आहे. आतापर्यंत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर, शरदचंद्र कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ओतूर, जी. एच. रायसोनी पॉलिटेक्निक नगर, जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग कुरण, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी, जे. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली, जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली आदी महाविद्यालयांतून राज्य स्तरावर, राष्ट्रीयस्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या प्रकल्पाला प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. संशोधन व विकास याविषयी संस्था नेहमीच पुढाकार घेऊन त्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, संस्थेचे सचिव विवेक शेळके, डॉ. अण्णासाहेब गोजे, डॉ. दीपराज देशमुख, प्रा. प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)४साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ४साखर कारखान्यामध्ये विविध प्रक्रियेदरम्यान प्रतिदिन सुमारे ४० ते ५० लाख लिटर पाण्याचा वापर होतो. त्यापैकी अंदाजे ३० ते ४० लाख लिटर पाणी वाया जाते. ४हे वाया जाणारे पाणी दूषित असल्याकारणाने इतरत्र कुठेही आपण वापरू शकत नाही. पाणी शुद्धीकरण यंत्रणेद्वारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत पाणी शुद्ध होते. ४उरलेले ४० टक्के पाणी जमिनीवर सोडून द्यावे लागते. परिणामी परिसरातील जमीन, विहीर व प्राणिमात्र यांना हानी पोहोचते. ४यावर उपाय म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे उपलब्ध होणाऱ्या व टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थांचा वापर करून हे सर्व टाळता येणे शक्य असल्याचे विनायक कांदळकर म्हणाला. शेवाळ ही वनस्पती दूषित पाण्याच्या ठिकाणी असते.