शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर होणार प्रक्रिया

By admin | Updated: March 28, 2017 02:35 IST

येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग

बेल्हा : येथील समर्थ ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग या विद्याशाखेतील विद्यार्थी विनायक कांदळकर याने पर्यावरणपूरक असा एक प्रकल्प तयार केला आहे. साखर कारखान्यातील वाया जाणाऱ्या पाण्यावर कमी खर्चात प्रक्रिया करणारा प्रकल्प असे या प्रकल्पाचे नाव आहे. नावाप्रमाणेच हा प्रकल्प अत्यंत कमी खर्चिक असा आहे.तिचा वापर करून साखर कारखान्यातून प्रक्रियेद्वारे निघणारा चोथा व त्याची झालेली राख, वाळलेल्या शेवग्याच्या शेंगेच्या बियांपासून तयार केलेली पावडर या सर्वांचे मिश्रण एका छोट्या टँकमध्ये ठेवलेल्या दूषित पाण्याबरोबर केले जाते. टँकमध्ये शेवाळ आणि दूषित पाणी यांचे मिश्रण १२ तास सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर व साखर कारखान्यातून प्रक्रियेद्वारे निघणारा चोथा व त्याची झालेली राख आणि वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांच्या बियांपासून तयार केलेली पावडर यांचे मिश्रण टँकमधील दूषित पाणी सूर्यप्रकाशात २४ तास ठेवल्यानंतर त्या दूषित पाण्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून आले. सूर्यप्रकाशामुळे या पाण्यामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले व त्यामध्ये घाण, कचरा कुजून तळाशी जाऊन बसतो. वर राहिलेले स्वच्छ पाणी शेतीसाठी व इतर कामासाठी आपण वापरू शकतो. कारखान्यातून निघणाऱ्या चोथ्यापासून निर्माण झालेली राख ही अत्यंत हानिकारक असते. राखेमध्ये असणारे सिलिका नावाचे मूलद्रव्य जर पाण्याच्या संपर्कात आले तर ते पाणी शरीराला घातकारक व अपायकारक ठरते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमाप्रमाणे कारखान्यातून निघणारे दूषित पाणी शेतीला वापरू शकत नाही. परंतु या प्रकल्पाद्वारे सदर शुद्धीकरण केलेले पाणी व त्याचे अहवाल महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणार असल्याचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रवीण सातपुते व प्रा. नितीन खाटमोडे, प्रा. महेश खोसे यांनी सांगितले आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी या विद्यार्थ्याने १५ संशोधन पेपरांचा अभ्यास करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्सचा अभ्यास केलेला आहे. आतापर्यंत अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर, शरदचंद्र कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ओतूर, जी. एच. रायसोनी पॉलिटेक्निक नगर, जयहिंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग कुरण, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी, जे. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली, जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय वाघोली आदी महाविद्यालयांतून राज्य स्तरावर, राष्ट्रीयस्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या प्रकल्पाला प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. संशोधन व विकास याविषयी संस्था नेहमीच पुढाकार घेऊन त्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, संस्थेचे सचिव विवेक शेळके, डॉ. अण्णासाहेब गोजे, डॉ. दीपराज देशमुख, प्रा. प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)४साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ४साखर कारखान्यामध्ये विविध प्रक्रियेदरम्यान प्रतिदिन सुमारे ४० ते ५० लाख लिटर पाण्याचा वापर होतो. त्यापैकी अंदाजे ३० ते ४० लाख लिटर पाणी वाया जाते. ४हे वाया जाणारे पाणी दूषित असल्याकारणाने इतरत्र कुठेही आपण वापरू शकत नाही. पाणी शुद्धीकरण यंत्रणेद्वारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत पाणी शुद्ध होते. ४उरलेले ४० टक्के पाणी जमिनीवर सोडून द्यावे लागते. परिणामी परिसरातील जमीन, विहीर व प्राणिमात्र यांना हानी पोहोचते. ४यावर उपाय म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सहजपणे उपलब्ध होणाऱ्या व टाकाऊ आणि निरुपयोगी पदार्थांचा वापर करून हे सर्व टाळता येणे शक्य असल्याचे विनायक कांदळकर म्हणाला. शेवाळ ही वनस्पती दूषित पाण्याच्या ठिकाणी असते.