शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

आव्हाळवाडीत सांडपाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: February 23, 2017 03:22 IST

आव्हाळवाडी गावात सांडपाण्यासाठी बंदिस्त गटार बांधण्यात आले. पाणी सोडण्यासाठी जागा

आव्हाळवाडी : आव्हाळवाडी गावात सांडपाण्यासाठी बंदिस्त गटार बांधण्यात आले. पाणी सोडण्यासाठी जागा नसल्याने हे पाणी गावाच्याजवळ सोडून दिले आहे. तेथे राहणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत असल्याने व येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याची दुर्गंधी येत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावाचा सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आव्हाळवाडी गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करून शासनाकडून पुरस्कार मिळाला आणि सरपंचपद हे सहा महिने, नऊ महिने ठेवून विकास कमी झाला. सांडपाण्याचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. सांडपाणी सोडण्याचा प्रश्न वाढू लागला, सांडपाण्यामुळे दुर्गंधी आणि डेंगी, मलेरिया, थंडीताप असे आजार होत असल्याने ग्रामपंचायतीने अंदाजे ५० लाख खर्च करून बंदिस्त गटार व सिमेंट रस्ते तयार केले, गटारामधून सांडपाणी गावच्या खालच्या बाजूला रस्त्याच्या बाजूने पाट करून सोडण्यात आले. या ठिकाणी गावाच्या वरच्या भागापर्यंत ९.५० मीटर पाईपलाईन शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर होईल, या उद्देशाने केली. काही शेतकऱ्यांनी वापर केला, तर काहींनी शेतकऱ्यांची अडवणूक केली. सांडपाणी पुढे जात नसल्याने ते तेथेच राहिल्याने तेथील बाजूला राहणारे नागरिक व येणारे-जाणारे वाहनचालक व पायी चालणारे नागरिक नाक दाबून जात आहेत. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे असे म्हणायचे का? हा प्रश्न कधी सुटणार? असे येथील नागरिक बोलत आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजून तसाच राहिला आहे. (वार्ताहर)पाणी साचल्याने जाते बोअरिंगमध्ये आव्हाळवाडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे यांनी या पाण्यावर काही महिने मका हे पीक घेऊन गुरांचा चाऱ्याचा प्रश्न सोडविला. यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाण्याचा वापर होत गेला. आता हे पाणी त्यांनी त्यांच्या शेतात बंद केल्याने ते पुढे जात नसल्याने तेथेच साचून आजूबाजूच्या बोअरिंगमध्ये जाते. हेच पाणी कामासाठी व पिण्यासाठी लोक वापरत आहेत.