शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

भोर शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: March 28, 2017 02:17 IST

अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे

भोर : अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. मोकाट जनावरे फिरत असून कचरा रस्त्यावर येत आहे. यातून रोगराई वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. मात्र, त्या गाड्या अपुऱ्या पडत असल्याने संपूर्ण शहरातील कचरा एका वेळी उचलला जात नाही. अजून गाड्यांची गरज आहे.गाड्या चार-चार दिवस एका गल्लीत जात नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावरील कचराकुंड्यात टाकतात. काहींनी नवीन कचराकुंड्या तयार केल्या आहेत. यामुळे शहरात रोगराई वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.घंटागाड्या वाढवून शहरातील कचरा रोजच्या रोज कसा बाहेर जाईल याकडे भोर नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय शहराबाहेर संरक्षक भिंत घालणे गरजेचे आहे. कचरा रोजच्या रोज जाळला जात नसल्याने वाऱ्याने उडून शेतात जात असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुढील महिन्यात नवीन तीन घंटागाड्या येणार असल्याने शहरातील कचऱ्याची समस्या कायमची सुटणार असल्याचे नगराध्यक्ष तृप्ती किरवे यांनी सांगितले.(वार्ताहर)