शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

खासगी शाळांकडून लूट थांबणार

By admin | Updated: January 23, 2017 02:15 IST

राज्यात शासनमान्य असलेल्या शाळेत मान्यता असलेल्या परीक्षा वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येऊ

कोरेगाव मूळ : राज्यात शासनमान्य असलेल्या शाळेत मान्यता असलेल्या परीक्षा वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असा आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षणसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली खासगी शाळांकडून पालकांची केली जाणारी लूट थांबणार आहे. राज्यात खोट्या गुणवत्तेच्या प्रक्रियेबरोबरच परीक्षेच्या नावाखाली खासगी शाळांकडून पैसा उकळला जात होता. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत पालकांनी मोठ्या आनंदाने केले आहे. राज्यात शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनप्रक्रिया सुरु झाली. मुलांवर येणारा परीक्षांचा ताण कमी करणे या उद्देशाने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर राज्याच्या पालकांचा गैरसमज करीत अनेकांच्या पालकांच्या अज्ञानाच्या फायदा घेत व शिक्षकांना बदनाम करीत स्वत:चा गोरखधंदा सुरु केला होता. याबाबत राज्यातील काही पालकांनी माहितीच्या अधिकारात वरिष्ठांकडे माहिती मागितली होती.अशा परीक्षा घेणारे विविध समूह राज्यात आहेत. साधारण परीक्षा फी १५० रुपये, त्यानंतर पुस्तकांची किंमत २०० रुपयांच्या दरम्यान, प्रश्नपत्रिका संच १०० रुपयापर्यंत विकले जाते, सर्व मिळून ५०० रुपयांपर्यंत खर्च आकारण्यात येतो. या परीक्षा पहिलीपासून घेतल्या जातात. अनेकदा मानसशात्रीय विचार, अभ्यासक्रम, शिक्षण क्षेत्रातील सिद्धांत याचा विचार न करता अभ्यासक्रम स्वत:च तयार करणे व अंमलबजावणी करणे होत असते.