शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

पंतप्रधानांनीच आता लक्ष द्यावे

By admin | Updated: August 20, 2015 02:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता ‘एफटीआयआय’च्या प्रश्नात लक्ष घालावे व गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून संस्थेची देशभर होत असलेली बदनामी थांबवावी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता ‘एफटीआयआय’च्या प्रश्नात लक्ष घालावे व गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून संस्थेची देशभर होत असलेली बदनामी थांबवावी, अशी मागणी न्यायालयातून जामिनावर सुटका झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सायंकाळी एफटीआयआयमध्ये आल्यानंतर केली. गजेंद्र चौहान नको, या मागणीशी ठाम असल्याचे स्पष्ट करून संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.संस्थेसाठी आजचा दिवस काळा दिवस होता. पोलिसांना बोलावून आपण संस्था चालवण्यास सक्षम नसल्याचे व्यवस्थापनाने दाखवून दिले, अशी टीका त्यांनी केली. मंगळवारी रात्री अटक झाल्यानंतरचा सर्व घटनाक्रम हिमांशू प्रजापती, राजू बिश्वास व अन्य तीन विद्यार्थ्यांनी पत्रकारांना सांगितला. रात्री १२ वाजता पोलीस आले. त्यांच्याजवळ १६ जणांची नावे होती. त्यात तीन मुली होत्या. सर्वांना अटक करणार, असे त्यांनी सांगितले. आम्ही संचालक, रजिस्ट्रार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दरवाजासुद्धा उघडला नाही. आमच्या वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनीसुद्धा इतक्या रात्री पोलीस आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.पोलिसांनी मुलींना अटक करणार नाही असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार ५ जणांनी अटक करून घेण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे आम्हाला डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराची करतात त्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी, हातांचे ठसे अशी कारवाई झाली. पोलीस ठाण्यातच झोपावे लागले. सकाळी न्यायालयात नेल्यानंतर तिथे असीम सरोदे, श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली. जामिनावर सुटका करताना न्यायालयानेही संस्थेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले व इतक्या रात्री पोलीस कारवाईची गरज नव्हती, असे मत व्यक्त केल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. १ सप्टेंबरला आता पुन्हा न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले हा संचालक प्रशांत पाठराबे यांचा आरोप विद्यार्थ्यांनी खोडून काढला. त्या बैठकीचे चित्रीकरणही न्यायालयात आज सादर करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या चौहान यांच्या नियुक्तीवरून देशभरात संस्थेची बदनामी होत आहे. हा प्रश्न आता फक्त पुण्याचा किंवा एखाद्या राज्याचा राहिलेला नसून देशाचा झाला आहे. संप असाच सुरू राहिला तर तो देशातील सर्व विद्यार्थ्यांचा होईल. आता तरी पंतप्रधानांनी यात लक्ष घालावे व या नावाजलेल्या संस्थेची बदनामी थांबवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. (प्रतिनिधी)