शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

काकडी, फ्लॉवर, मटार आणि पावट्याचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकी आहे. मात्र, मागणी वाढल्याने काकडी, फ्लॉवर, मटार आणि पावट्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याइतकी आहे. मात्र, मागणी वाढल्याने काकडी, फ्लॉवर, मटार आणि पावट्याच्या दरात वाढ झाली, तर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि. २८) रोजी ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली. यात परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १० टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ ते ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटक गुजरात आणि आंध्रप्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून मटार १० ते १२ ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजरातधून १४ ते १५ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर आणि स्थानिक परिसरातून बटाट्याची ३० ते ३५ ट्रक इतकी आवक झाली आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले १३०० ते १४०० गोणी, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, पावटा ३ टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, भुईमुग शेंग ३० ते ४० गोणी, गावरान कैरी २ टेम्पो, कांदा ७० ट्रक इतकी आवक झाली.

------

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा १२-२७ २५-५०

बटाटा ०८-१२ १५-३०

टोमॅटो ०६-१० १५-२५

भेंडी ३०-४५ ४०-५०

गवार ३५-४० ४०-५०

मिरची ३५-५५ ४५-६०

कोथिंबीर ०७-१० १०-१५

मेथी ०३-०७ १०-१५

मटार २५-२६ ४०-५०

गाजर १५-१८ २०-२५

---

पालेभाज्यांचे दर घसरले

मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, कांदापात, करडई, अंबाडी, राजगिरा, हरभरा गड्डीच्या दरात घसरण झाली. तर चुका आणि चवळईच्या दरात वाढ झाली. मेथी, शेपू, पुदीना, मुळे आणि पालकचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केटयार्डात कोथिंबिरीच्या पावणेदोन लाख जुड्यांची, मेथीची ७० हजार जुड्यांची तर हरभऱ्याची ८ ते १० हजार गड्डींची आवक झाली.

कोथींबीरीच्या भावात घाऊक बाजारात तब्बल ६ हजार रुपयांची, कांदा पात, चाकवत आणि राजगिऱ्याच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांची तर करडई आणि अंबाडीच्या दरात प्रत्येकी एक रुपयांची घसरण झाली आहे. तर चुका आणि चवळईच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे.