शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

भावनेतून प्रकट होणाऱ्या शब्दाला मूल्य

By admin | Updated: March 29, 2017 02:43 IST

शब्द जेव्हा भावनेच्या माध्यमातून प्रकट होतात, तेव्हा त्यांना साहित्यिक मूल्य प्राप्त होते. बुद्धी, मन आणि मनगट यांच्या

पुणे : शब्द जेव्हा भावनेच्या माध्यमातून प्रकट होतात, तेव्हा त्यांना साहित्यिक मूल्य प्राप्त होते. बुद्धी, मन आणि मनगट यांच्या समन्वयाने मिळणारे शिक्षण म्हणजे ज्ञान, असे मौलिक विचार विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांनी व्यक्त केले.कवयित्री शोभा पांडे यांच्या ‘तरंग मनाचे’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्यात प्रा. डॉ. पुंड बोलत होते. गुरू गणेशनगर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला डॉ. चंद्रकांत पांढरीपांडे, पं. यादवराज फड, प्रकाशिका त्रिवेणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.कवयित्रीच्या जाणिवा यांना समाजाचे काही देणे असते. कविता व तिचा आशय हा समाजातील पारंपरिक जीवनमूल्यांचे पोषण करणारा असल्याचे जाणवते, असे मत डॉ. पुंड यांनी व्यक्त केले.‘वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्त्व, स्पर्श जैसा’ ही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सांगून पं. फड यांनी कवितेच्या माध्यमातून रसिकांनी परतत्त्वाची ओळख करून दिली.श्रीपाद पांडे, मनीषा सुभेदार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. मंजूषा बापट यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)