शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गुऱ्हाळघराच्या उसाला भाव कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST

रांजणगाव सांडस: शिरूरच्या पूर्व भागात साखर कारखाने असल्याने गुऱ्हाळघरांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, या गुऱ्हाळघरांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने त्याचा ...

रांजणगाव सांडस: शिरूरच्या पूर्व भागात साखर कारखाने असल्याने गुऱ्हाळघरांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, या गुऱ्हाळघरांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे. लॉकडाऊन संपला असला, तरी गुऱ्हाळघरातील कामगार परतले नाहीत. त्यामुळे आपोआपच उसाची मागणीही कमी झाली. गतवर्षी मिळणाऱ्या तीन हजार ते तीन हजार २०० च्या तलुनेत यंदा या उसाला दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० दर मिळत आहे. सध्या अनलॉक झाले असले तरी उसाला मात्र, भाव कमीच मिळत आहे.

गतवर्षी पडलेल्या पावसामुळे भीमा नदीकाठावरील गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाण ऊस पीक घेतले. दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे गुऱ्हाळघरांमध्ये कामाला असणारे परप्रांतीय कामगार तसेच ऊसतोड मजूर आपापल्या गावी निघून गेले. त्यामुळे गुऱ्हाळघर मालकांसह शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर साखर हंगाम सुरु झाला अन् आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा शेतकऱ्यांना मार्ग मिळाला. कारखाने सुरु झाल्याने ऊस कारखान्यास घालण्याची लगबग सुुरु झाली पण मजुरांची कमतरता हे संकट उभे राहिले. अनेक शेतकऱ्यांचा यावर्षी कमी ऊस कारखान्यांना गेला. तसेच पावसाचाही फटका सहन करावा लागला होता.

गुऱ्हाळघरांचीही तीच अवस्था पहायला मिळत आहे. गुऱ्हाळघरांमध्ये परप्रांतीय कामगार असतात. लॉकडाऊनमुळे हे सर्व जण आपल्या गावी गेले आहेत. अपवाद वगळता अनेक जण अजूनपर्यंत ते परतले नाहीत. त्यामुळे यावर्षी गुऱ्हाळघरे उशिरा सुरु झाली. उरला प्रश्न तो गूळ उत्पादनाचा. कामगारच नसल्याने गुऱ्हाळघर मालकही उत्पादनास सुरुवात करायची की नाही, या व्दिधा मन:स्थितीत आहेत. अनलॉकनंतर परिस्थिती बदलेल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही.

गुऱ्हाळघरांसाठी लागणाऱ्या उसाचाही प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी गुऱ्हाळघर सुरु आहे त्या ठिकाणी शेतकरी ऊस देत आहेत. पण अपेक्षित असा भाव मिळत नाही. गतवर्षी या उसाला तीन हजार ते तीन हजार २०० रुपये दर मिळाला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये हाच दर दोन हजार ते दोन हजार ३०० पर्यंत गेला. मात्र, अनलॉकनंतर ही परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण आता हा ऊस दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० रुपये दराने घेतला जात आहे. त्यामुळे उसाला भाव तलुनेत कमीच मिळत नाही.

गुऱ्हाळघरांना लागणाऱ्या उसाला गेल्या वर्षी तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे अपेक्षित असा दर मिळत नाही. गुऱ्हाळघरांचे कामगार गावाकडून न परतल्याने अनेक गुऱ्हाळघरे बंद आहे तर ज्या ठिकाणी सुरु आहे त्या ठिकाणी उसाला अडीज हजारापर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे दर कधी वाढणार या अपेक्षा शेतकरी करत आहे.

२२ रांजणगाव सांडस ऊस