शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुऱ्हाळघराच्या उसाला भाव कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST

रांजणगाव सांडस: शिरूरच्या पूर्व भागात साखर कारखाने असल्याने गुऱ्हाळघरांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, या गुऱ्हाळघरांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने त्याचा ...

रांजणगाव सांडस: शिरूरच्या पूर्व भागात साखर कारखाने असल्याने गुऱ्हाळघरांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, या गुऱ्हाळघरांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झालेला आहे. लॉकडाऊन संपला असला, तरी गुऱ्हाळघरातील कामगार परतले नाहीत. त्यामुळे आपोआपच उसाची मागणीही कमी झाली. गतवर्षी मिळणाऱ्या तीन हजार ते तीन हजार २०० च्या तलुनेत यंदा या उसाला दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० दर मिळत आहे. सध्या अनलॉक झाले असले तरी उसाला मात्र, भाव कमीच मिळत आहे.

गतवर्षी पडलेल्या पावसामुळे भीमा नदीकाठावरील गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाण ऊस पीक घेतले. दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे गुऱ्हाळघरांमध्ये कामाला असणारे परप्रांतीय कामगार तसेच ऊसतोड मजूर आपापल्या गावी निघून गेले. त्यामुळे गुऱ्हाळघर मालकांसह शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर साखर हंगाम सुरु झाला अन् आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा शेतकऱ्यांना मार्ग मिळाला. कारखाने सुरु झाल्याने ऊस कारखान्यास घालण्याची लगबग सुुरु झाली पण मजुरांची कमतरता हे संकट उभे राहिले. अनेक शेतकऱ्यांचा यावर्षी कमी ऊस कारखान्यांना गेला. तसेच पावसाचाही फटका सहन करावा लागला होता.

गुऱ्हाळघरांचीही तीच अवस्था पहायला मिळत आहे. गुऱ्हाळघरांमध्ये परप्रांतीय कामगार असतात. लॉकडाऊनमुळे हे सर्व जण आपल्या गावी गेले आहेत. अपवाद वगळता अनेक जण अजूनपर्यंत ते परतले नाहीत. त्यामुळे यावर्षी गुऱ्हाळघरे उशिरा सुरु झाली. उरला प्रश्न तो गूळ उत्पादनाचा. कामगारच नसल्याने गुऱ्हाळघर मालकही उत्पादनास सुरुवात करायची की नाही, या व्दिधा मन:स्थितीत आहेत. अनलॉकनंतर परिस्थिती बदलेल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही.

गुऱ्हाळघरांसाठी लागणाऱ्या उसाचाही प्रश्न निर्माण झाला. ज्या ठिकाणी गुऱ्हाळघर सुरु आहे त्या ठिकाणी शेतकरी ऊस देत आहेत. पण अपेक्षित असा भाव मिळत नाही. गतवर्षी या उसाला तीन हजार ते तीन हजार २०० रुपये दर मिळाला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये हाच दर दोन हजार ते दोन हजार ३०० पर्यंत गेला. मात्र, अनलॉकनंतर ही परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण आता हा ऊस दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० रुपये दराने घेतला जात आहे. त्यामुळे उसाला भाव तलुनेत कमीच मिळत नाही.

गुऱ्हाळघरांना लागणाऱ्या उसाला गेल्या वर्षी तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे अपेक्षित असा दर मिळत नाही. गुऱ्हाळघरांचे कामगार गावाकडून न परतल्याने अनेक गुऱ्हाळघरे बंद आहे तर ज्या ठिकाणी सुरु आहे त्या ठिकाणी उसाला अडीज हजारापर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे दर कधी वाढणार या अपेक्षा शेतकरी करत आहे.

२२ रांजणगाव सांडस ऊस