शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

वीज कोसळू नये म्हणून ८०० गावांत बसवणार अटकाव यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. तर काही ठिकाणी मोठी वित्तहानीदेखील झाली आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वीज अटकाव यंत्रणेच्या पायलट प्रोजेक्टमध्ये चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

वीज पडणे ही नैसर्गिक घटना असली तरी दर वर्षी यामुळे मुनष्य, पशु आणि वित्त हानी होत असते. एका सर्वेक्षणानुसार देशात दरवर्षी सुमारे २५०० व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे जेणेकरून मनुष्य, पशु आणि वित्त हानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. माॅन्सून सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्या काळात विजा कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. गडगडाटी वादळासह विजा चमकतात कुठेतरी कोस‌ळतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरू असते. त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना नियमित घडत असतात. वीज कोसळण्याने होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने सर्वाधिक धोका असलेल्या गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

------

--------

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी (आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना)

- विद्युत उपकरणे उदाहरणार्थ हेअर ड्रायर, विद्युत टुथब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

- वादळात टेलिफोनचा वापर टाळा, वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहू शकते.

- बाहेर असताना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.

- अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.

- जर तुम्हाला विद्युतभारीत वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

-------

८०० गावांत यंत्रणा बसविणे सुरू

राज्य शासनाने यंदा प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या गावात वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, याबाबत काम सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.