शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळू नये म्हणून ८०० गावांत बसवणार अटकाव यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. तर काही ठिकाणी मोठी वित्तहानीदेखील झाली आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वीज अटकाव यंत्रणेच्या पायलट प्रोजेक्टमध्ये चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

वीज पडणे ही नैसर्गिक घटना असली तरी दर वर्षी यामुळे मुनष्य, पशु आणि वित्त हानी होत असते. एका सर्वेक्षणानुसार देशात दरवर्षी सुमारे २५०० व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे जेणेकरून मनुष्य, पशु आणि वित्त हानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. माॅन्सून सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्या काळात विजा कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. गडगडाटी वादळासह विजा चमकतात कुठेतरी कोस‌ळतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरू असते. त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना नियमित घडत असतात. वीज कोसळण्याने होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने सर्वाधिक धोका असलेल्या गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

------

--------

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी (आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना)

- विद्युत उपकरणे उदाहरणार्थ हेअर ड्रायर, विद्युत टुथब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

- वादळात टेलिफोनचा वापर टाळा, वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहू शकते.

- बाहेर असताना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.

- अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.

- जर तुम्हाला विद्युतभारीत वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

-------

८०० गावांत यंत्रणा बसविणे सुरू

राज्य शासनाने यंदा प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या गावात वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, याबाबत काम सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.