पुणो : बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘मराठी ङोंडा’ फडकाविला; मग गेल्या दोन वर्षात बेळगाव सीमाप्रश्नावर का नाही ठराव संमत केला गेला, असा सवाल उपस्थित करीत आम्ही बेळगावमध्ये किमान नाटय़संमेलन घेण्याचे धाडस तरी दाखविले; मात्र मोहन जोशी यांच्या वक्तव्यानंतर निषेध मोर्चा काढून त्यांनी माफी मागावी आणि संमेलन आयोजित करण्यास असमर्थ आहोत, असे सांगण्यासाठी याच समितीने आमच्यावर दबाव टाकला असल्याचा गौप्यस्फोट अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
जोशी यांच्या संमेलनातील व्यासपीठावर सीमाप्रश्नासंबंधी कोणतेही विधान केले जाणार नाही, आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असे सांगून वादाला तोंड फोडले, याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध व्यक्त करून मोर्चे काढले. या पाश्र्वभूमीवर बेळगाव नाटय़ परिषदेच्या भूमिकेबद्दल लोकूर यांच्याशी संवाद साधण्यात आला.
आता संमेलन केले किंवा नाही केले तरी आमच्यावर दडपण असणारच आहे. संमेलन आयोजित केले म्हणून समितीचा दबाव आणि नाही केले तर मराठी जनतेचा रोष, असे दोन्हीकडून आमचीच गळचेपी होणार आहे, असेही त्या म्हणाल्या. आमच्या नाटय़ परिषद शाखेच्या पदाधिका:यांची बेळगावात बैठक सुरू आहे, निर्णय अद्याप झालेला
नाही. येत्या रविवारी (दि. 14 डिसेंबर) नियामक मंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये चर्चा होईल, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
4बेळगावमध्ये एकंदर तापलेले वातावरण पाहता या ठिकाणी नाटय़संमेलन आयोजित करण्याचे आम्ही धाडस दाखविले. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही सर्वाचीच मागणी आहे; पण सध्या तरी बेळगाव हे कर्नाटकात आहे.
4संमेलनाच्या आयोजनासाठी मंडप उभारण्यापासून विविध गोष्टींच्या परवान्यांची आवश्यकता असते. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य घेण्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीची मदत घेतली असती तर अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ आमच्यावर आली असती.
4निधी उभा कसा करणार, हा यक्षप्रश्न आमच्यासमोर आहेच. इतक्या वर्षात समितीने मग का नाही बेळगावात संमेलन आयोजित केले? किंवा महापालिकेमध्ये बेळगाव सीमाप्रश्नावर ठराव संमत केला? असा सवालही लोकूर यांनी केला.