शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

प्रशांत अय्यंगार – ‘योग-संशोधनातील महर्षी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

प्रासंगिक - लोगो भारतातील सर्वश्रेष्ठ योगसंस्था म्हणून पंतप्रधान यांनी पंचवीस लाख रुपयांचे पारितोषक देऊन पुण्यातील ‘रमामणी अय्यंगार मेमोरियल ...

प्रासंगिक - लोगो

भारतातील सर्वश्रेष्ठ योगसंस्था म्हणून पंतप्रधान यांनी पंचवीस लाख रुपयांचे पारितोषक देऊन पुण्यातील ‘रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट’चा गौरव केला आहे. त्या संस्थेचे संचालक प्रशांत अय्यंगार हे आहेत. या जगात ते ‘आंतरराष्ट्रीय ‘योग शिक्षक-संशोधक’ म्हणून ओळखले जातात. भारत सरकारच्या ‘आयुष मंत्रालयाने’ त्यांचा देशातील नामवंत ‘योगगुरु’ म्हणून त्यांचे छायाचित्र ‘आयुष मंत्रालयाच्या’ संकेत स्थळावर स्थापित केले आहे, यातच त्यांचे मोठेपण दडले आहे.

योगाभ्यास हा चित्त वृत्ती निरोध आहे. योगज्ञान आत्मसात केल्यानंतर व्यक्तीच्या ‘चित्त’ वृत्तीत सकारात्मक बदल होतात म्हणजे अपप्रवृत्तींचा त्याग होतो व चांगल्या प्रवृत्तींकडे आपोआपच मन वळते असे ते सांगतात. बुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं. आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो. मन एकाग्र होतं. आपल्या मनाची ताकद वाढविणं, शक्य होत. माणसाचं मन काबूत असणे ही मोठी गोष्ट आहे. तथापि, शरीराबरोबरच मन कणखर असेल तर मग आपण संकटांवर निश्चितच मात करू शकतो. हे योगासनाद्वारे शक्य आहे अशी त्यांची निष्ठा आहे. मुंबईस रेल्वेने जाताना कर्जत येथे वडा खायची इच्छा असल्यास प्रवास मुंबईपर्यंत असल्याने वडा मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण ही इच्छा कर्जत रेल्वेस्टेशन मुंबईला जायच्या मार्गावरच असल्याने विनासायास मिळणार असते. तद्वत योगआसने करीत असताना योगाचे जे अनेक फायदे स्नातकास आपोआप मिळत असतात. त्यात ‘प्रकृती स्वास्थ्य’ हे एक आहे, त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही असा त्यांचा विश्वास आहे. योगातील ध्यान, धारणा व समाधी अवस्था म्हणजे या विश्वातील ‘योगाविद्येमुळे’ मिळणारा ‘परमोच्च आनंद’ !! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच यात कार्यरत असतात. हा चैतन्याचा परमोच्च आनंद योगामुळे शक्य आहे असे त्यांचे सांगणे आहे. अधिकाधिक लोकांनी योगविद्येचा अंगीकार केला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटते व म्हणूनच गेली ४९ वर्षे ते योगविद्या शिकविण्याचे पवित्र कार्य मनापासून करीत आहेत.

प्रशांत सरांचा प्राणायामाचा प्रत्येक वर्ग म्हणजे बौद्धिक मेजवानीच ठरावी. ‘श्वासायाम’ हा योगाचा ‘गाभा’ त्यांनी मानला आहे. भौतिक पार्श्वभूमीमुळे ‘मन’ शरीरात बंदिस्त स्थितीत असते तर ‘श्वास’ बाहेरून येतो. ‘श्वास’ कधीच ‘कायमच्या’ वास्तव्यासाठी नसतो. योगात श्वासांमुळे विविध इंद्रियांमध्ये बरेच परिणाम केले जातात. त्यामुळे योगासने झाल्यानंतर शरीरात चैतन्य निर्माण झाल्याने होणारे बदल ‘स्फूती’ निर्माण करतात. सध्या श्वासाचा शरीरावर होणारा परिणाम शास्त्रीयदृष्ट्या प्रगल्भ झालेला नाही किंबहुना अजून खूप संशोधन होणे बाकी असे त्यांचे मत आहे.

अय्यंगार पॅटर्नमध्ये प्रॉप्सचा शोधून काढलेला वापर योगविद्या शिकविताना ते अतिशय कल्पकतेने करीत असतात त्यामुळे योगासने करताना कधीही थकवा जाणवत नाही पण आसनागणीक शरीरात नवचैतन्य संचारते. प्रशांत सर शतायुषी व्हावेत.

------------