शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रशांत अय्यंगार – ‘योग-संशोधनातील महर्षी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

प्रासंगिक - लोगो भारतातील सर्वश्रेष्ठ योगसंस्था म्हणून पंतप्रधान यांनी पंचवीस लाख रुपयांचे पारितोषक देऊन पुण्यातील ‘रमामणी अय्यंगार मेमोरियल ...

प्रासंगिक - लोगो

भारतातील सर्वश्रेष्ठ योगसंस्था म्हणून पंतप्रधान यांनी पंचवीस लाख रुपयांचे पारितोषक देऊन पुण्यातील ‘रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट’चा गौरव केला आहे. त्या संस्थेचे संचालक प्रशांत अय्यंगार हे आहेत. या जगात ते ‘आंतरराष्ट्रीय ‘योग शिक्षक-संशोधक’ म्हणून ओळखले जातात. भारत सरकारच्या ‘आयुष मंत्रालयाने’ त्यांचा देशातील नामवंत ‘योगगुरु’ म्हणून त्यांचे छायाचित्र ‘आयुष मंत्रालयाच्या’ संकेत स्थळावर स्थापित केले आहे, यातच त्यांचे मोठेपण दडले आहे.

योगाभ्यास हा चित्त वृत्ती निरोध आहे. योगज्ञान आत्मसात केल्यानंतर व्यक्तीच्या ‘चित्त’ वृत्तीत सकारात्मक बदल होतात म्हणजे अपप्रवृत्तींचा त्याग होतो व चांगल्या प्रवृत्तींकडे आपोआपच मन वळते असे ते सांगतात. बुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं. आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो. मन एकाग्र होतं. आपल्या मनाची ताकद वाढविणं, शक्य होत. माणसाचं मन काबूत असणे ही मोठी गोष्ट आहे. तथापि, शरीराबरोबरच मन कणखर असेल तर मग आपण संकटांवर निश्चितच मात करू शकतो. हे योगासनाद्वारे शक्य आहे अशी त्यांची निष्ठा आहे. मुंबईस रेल्वेने जाताना कर्जत येथे वडा खायची इच्छा असल्यास प्रवास मुंबईपर्यंत असल्याने वडा मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण ही इच्छा कर्जत रेल्वेस्टेशन मुंबईला जायच्या मार्गावरच असल्याने विनासायास मिळणार असते. तद्वत योगआसने करीत असताना योगाचे जे अनेक फायदे स्नातकास आपोआप मिळत असतात. त्यात ‘प्रकृती स्वास्थ्य’ हे एक आहे, त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही असा त्यांचा विश्वास आहे. योगातील ध्यान, धारणा व समाधी अवस्था म्हणजे या विश्वातील ‘योगाविद्येमुळे’ मिळणारा ‘परमोच्च आनंद’ !! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच यात कार्यरत असतात. हा चैतन्याचा परमोच्च आनंद योगामुळे शक्य आहे असे त्यांचे सांगणे आहे. अधिकाधिक लोकांनी योगविद्येचा अंगीकार केला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटते व म्हणूनच गेली ४९ वर्षे ते योगविद्या शिकविण्याचे पवित्र कार्य मनापासून करीत आहेत.

प्रशांत सरांचा प्राणायामाचा प्रत्येक वर्ग म्हणजे बौद्धिक मेजवानीच ठरावी. ‘श्वासायाम’ हा योगाचा ‘गाभा’ त्यांनी मानला आहे. भौतिक पार्श्वभूमीमुळे ‘मन’ शरीरात बंदिस्त स्थितीत असते तर ‘श्वास’ बाहेरून येतो. ‘श्वास’ कधीच ‘कायमच्या’ वास्तव्यासाठी नसतो. योगात श्वासांमुळे विविध इंद्रियांमध्ये बरेच परिणाम केले जातात. त्यामुळे योगासने झाल्यानंतर शरीरात चैतन्य निर्माण झाल्याने होणारे बदल ‘स्फूती’ निर्माण करतात. सध्या श्वासाचा शरीरावर होणारा परिणाम शास्त्रीयदृष्ट्या प्रगल्भ झालेला नाही किंबहुना अजून खूप संशोधन होणे बाकी असे त्यांचे मत आहे.

अय्यंगार पॅटर्नमध्ये प्रॉप्सचा शोधून काढलेला वापर योगविद्या शिकविताना ते अतिशय कल्पकतेने करीत असतात त्यामुळे योगासने करताना कधीही थकवा जाणवत नाही पण आसनागणीक शरीरात नवचैतन्य संचारते. प्रशांत सर शतायुषी व्हावेत.

------------