शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

बाबीर देवस्थानच्या यात्रेतील बगाडाची प्रथा बंद

By admin | Updated: November 15, 2015 00:52 IST

रुई (ता़ इंदापूर) येथील बाबीरबुवा देवस्थानची यात्रा यंदा वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. शेकडो वर्षापासून नवस फेडण्यासाठी असलेली परंपरा या वर्षी प्रथमच खंडीत करण्यात आली आहे .

कळस : रुई (ता़ इंदापूर) येथील बाबीरबुवा देवस्थानची यात्रा यंदा वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. शेकडो वर्षापासून नवस फेडण्यासाठी असलेली परंपरा या वर्षी प्रथमच खंडीत करण्यात आली आहे . बालकांच्या पायाला बांधून शेंदण्याची प्रथा शेकडो वर्षापासून सुरु होती़ त्याऐवजी आता बालकांना पाळण्यात बसवून झोका देण्याची प्रथा यंदापासून सुरु करण्यात आली़ यात्रेत आलेल्या लाखो भाविकांमध्ये नवस फेडण्याच्या पध्दतीमध्ये झालेला बदल चर्चेचा विषय ठरला. बालकांच्या सुरक्षिततेसाठी झालेला हा बदल महत्वपूर्ण मानला जात आहे. मागील वर्षी या प्रथेच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवला. त्यामुळे व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. बाबीर देवस्थान नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांमध्ये श्रद्धा आहे. विशेषत मुल होण्यासाठी या देवस्थानला नवस करण्याची प्रथा आहे. त्यासाठी जन्माला येणाऱ्या बालकाला देवस्थानच्या पायरीवरुन पायाला पागोटे बांधुन घागरीप्रमाणे शेंदण्याची प्रथा होती. अनेक वर्षापासून ही प्रथा होती. मात्र, मागील वर्षापासून या प्रथे विरोधात तक्रारी झाल्या. श्रद्धेच्या नावाखाली बालकांचे जीव धोक्यात घातले जात आहे, अशी तक्रार होती. ‘लोकमत’ सह सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला. पोलिसांनी त्याची दखल घेऊन या पद्धतीने नवस फेडणाऱ्या तीन भाविकांवर गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यामुळे यंदा भाविकांनी देखील धास्ती घेतली होती. त्यामुळेच विश्वस्तांनी या प्रथेला बगल देऊन पर्याय शोधला. मुलांच्या पायाला फेटा बांधून शेंदण्याऐवजी पाळण्यात बसवून झोका देण्याची नवी प्रथा सुरू केली. सुमारे २० ते २५ फुट उंचीवरुन बालकाला खाली सोडण्यात येत होते. अंधश्रध्दा निर्मुलन समिती ने गतवर्षी नवस फेडण्याच्या या प्रथेविरोधात आवाज उठविला. या पार्श्वभूमीवर यंदा नवस फेडण्याच्या बगाड प्रथेला फाटा देण्यात आला. तर यामध्ये बालकाला पायाला पागोटे बांधुन खाली सोडुन शेंदण्याची पूर्ण बंद करण्यात आली. याऐवजी नवस फेडण्याची सर्वमान्य पध्दत अमलात आणण्यात आली. या पध्दतीमध्ये बालकाला बगाड देण्याऐवजी पाळण्यात बसवुन झोका देण्यास सुरवात केली आहे. बगाड प्रथा बंद केल्याचे फलक देवस्थानेने या ठिकाणी लावले आहेत. त्यानुसार सुधारीत पध्दतीने भक्तांनी यंदा च्या यात्रोत्सवापासुन सुरवात केल्याचे चित्र आहे़ त्यामुळे ही यात्रा एैतिहासिक ठरली आहे.