शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बाबीर देवस्थानच्या यात्रेतील बगाडाची प्रथा बंद

By admin | Updated: November 15, 2015 00:52 IST

रुई (ता़ इंदापूर) येथील बाबीरबुवा देवस्थानची यात्रा यंदा वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. शेकडो वर्षापासून नवस फेडण्यासाठी असलेली परंपरा या वर्षी प्रथमच खंडीत करण्यात आली आहे .

कळस : रुई (ता़ इंदापूर) येथील बाबीरबुवा देवस्थानची यात्रा यंदा वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. शेकडो वर्षापासून नवस फेडण्यासाठी असलेली परंपरा या वर्षी प्रथमच खंडीत करण्यात आली आहे . बालकांच्या पायाला बांधून शेंदण्याची प्रथा शेकडो वर्षापासून सुरु होती़ त्याऐवजी आता बालकांना पाळण्यात बसवून झोका देण्याची प्रथा यंदापासून सुरु करण्यात आली़ यात्रेत आलेल्या लाखो भाविकांमध्ये नवस फेडण्याच्या पध्दतीमध्ये झालेला बदल चर्चेचा विषय ठरला. बालकांच्या सुरक्षिततेसाठी झालेला हा बदल महत्वपूर्ण मानला जात आहे. मागील वर्षी या प्रथेच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवला. त्यामुळे व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. बाबीर देवस्थान नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांमध्ये श्रद्धा आहे. विशेषत मुल होण्यासाठी या देवस्थानला नवस करण्याची प्रथा आहे. त्यासाठी जन्माला येणाऱ्या बालकाला देवस्थानच्या पायरीवरुन पायाला पागोटे बांधुन घागरीप्रमाणे शेंदण्याची प्रथा होती. अनेक वर्षापासून ही प्रथा होती. मात्र, मागील वर्षापासून या प्रथे विरोधात तक्रारी झाल्या. श्रद्धेच्या नावाखाली बालकांचे जीव धोक्यात घातले जात आहे, अशी तक्रार होती. ‘लोकमत’ सह सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला. पोलिसांनी त्याची दखल घेऊन या पद्धतीने नवस फेडणाऱ्या तीन भाविकांवर गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यामुळे यंदा भाविकांनी देखील धास्ती घेतली होती. त्यामुळेच विश्वस्तांनी या प्रथेला बगल देऊन पर्याय शोधला. मुलांच्या पायाला फेटा बांधून शेंदण्याऐवजी पाळण्यात बसवून झोका देण्याची नवी प्रथा सुरू केली. सुमारे २० ते २५ फुट उंचीवरुन बालकाला खाली सोडण्यात येत होते. अंधश्रध्दा निर्मुलन समिती ने गतवर्षी नवस फेडण्याच्या या प्रथेविरोधात आवाज उठविला. या पार्श्वभूमीवर यंदा नवस फेडण्याच्या बगाड प्रथेला फाटा देण्यात आला. तर यामध्ये बालकाला पायाला पागोटे बांधुन खाली सोडुन शेंदण्याची पूर्ण बंद करण्यात आली. याऐवजी नवस फेडण्याची सर्वमान्य पध्दत अमलात आणण्यात आली. या पध्दतीमध्ये बालकाला बगाड देण्याऐवजी पाळण्यात बसवुन झोका देण्यास सुरवात केली आहे. बगाड प्रथा बंद केल्याचे फलक देवस्थानेने या ठिकाणी लावले आहेत. त्यानुसार सुधारीत पध्दतीने भक्तांनी यंदा च्या यात्रोत्सवापासुन सुरवात केल्याचे चित्र आहे़ त्यामुळे ही यात्रा एैतिहासिक ठरली आहे.