शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचारांनी मिळते ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. अशी अनेक संकटे आली असली, तरी धरती फाटली नसून ती ...

पुणे : कोरोनामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. अशी अनेक संकटे आली असली, तरी धरती फाटली नसून ती सुरक्षित आहे. त्यामुळे हार मानून चालणार नाही. एक प्रेरणा मिळाली की उत्साह वाढतोच. नैराश्याने अथवा नकारात्मक विचारांनी मरगळ येते. मात्र सकारात्मक विचारांनी ऊर्जा मिळते, असे मत निवृत्त कॅप्टन श्यामराज ई. व्ही. यांनी व्यक्त केले.

सुरेंद्र पठारे फाउंडेशन आणि यूथ फाउंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित संवाद तरुणांचा तरुणांसाठी या कार्यक्रमात ते बोलत होते. व्हिक्टोरिअस स्कूलचे संस्थापक अध्यक्ष व निवृत्त विंग कमांडर रॉबिन घोष यांनीही तरुणांशी संवाद साधला. माजी आमदार बापूसाहेब पठारे, मेजर शिवप्रिया श्यामराज, नगरसेवक भैयासाहेब जाधव, यूथ फाउंडेशनचे रोहन शेट्टी उपस्थित होते.

माईकची भीती वाटते. मात्र, बंदुकीची नाही असे सांगून श्यामराज म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठे स्वप्न असते. मात्र, जिद्द, चिकाटी असेल तर आयुष्याच्या कोणत्याही वळणार यश प्राप्त करता येते. ध्येय गाठताना यश-अपयश येतच असते. अपयश आले की आजची मुलं टोकाची पावले उचलतात. हार नमानता स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. ऑपरेशन पराक्रम मोहिमेच्या हल्ल्यात जखमी झालो. सोबत असलेल्या सहका-यांपैकी ९ सहकारी शहीद झाले. हे सहा महिन्यांनी समजले. काहीकाळ कोमामध्ये गेलो. तीन वर्षांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. हात-पाय सुरक्षित राहिले मात्र पायांवर उभे राहता येत नाही. कधी तरी उभे राहून चालेल या आशेवर जीवन जगत आहे. आईवडिलांसाठी जिवंत राहिलो हे नशीब समजून देवाचे आभार मानत असतो.

रॉबिन घोष म्हणाले की, एकविसाव्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल, असे भाकीत स्वामी विवेकानंद यांनी केले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या युवापिढीचा सहयोग महत्वाचा आहे. सत्यता, प्रामाणिकता, सेवाभावी वृत्ती जोपासावी. स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांना मार्गदर्शक आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत राहावे.

स्नेहा करमरकर आणि निखिल लिमये यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेणार

तरुणांना घडविण्यासाठी फाउंडेशन काम करणार आहे. प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आपल्याला यश संपादन करता येते. याची प्रचिती यावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले. पुढील काळात रोजगार मेळावा, तसेच नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार असल्याचे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.

फोटो : निवृत्त कॅप्टन श्यामराज ई. व्ही. मार्गदर्शन करताना.