शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

गरीब कुटुंबांना मिळाला जगण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे ...

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे महाग झाल्याचे समोर आले आहे. मध्यंतरीच्या काळात सर्व निर्बंध हटवण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी रोजगार उपलब्ध होत होता. विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येईल असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणाऱ्या व दररोज रोजंदारीने काम करून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणाऱ्या देशातील लाखो कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच शिरूर शहरातही अशी शेकडो कुटुंब राहत आहेत.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी, प्रकाश सुराणा व राजू दुगड यासह आडते दुकानदारांच्या या उन्हाळ्याच्या हंगामात शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे शेकडो टन चिंचेचा व्यवहार होतो. ही वाळलेली चिंचाचे टरफल फोडणे, चिंचोके वेगळे करणे, त्यांचा गाभा वेगळा करणे ही कामे केली जातात. यानंतर चिंचेच्‍या या घटकांचे पॅकिंग करून हे व्यापारी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात राज्यात खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या उपयोगासाठी पाठवितात.

ही वाळलेली चिंच या व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर सुमारे १५ ते २० किलो चिंच वजन करून घरी आणणे, फोडणे, त्यांचे चिंचोके वेगळे करणे, टरफले वेगळे करणे व पुन्हा वजन करुन देणे यासाठी प्रत्येकी किलोला सुमारे १० ते १५ रुपयांचा भाव या आडते व्यापाऱ्यांकडून दिला जातो. याप्रमाणे शहरातील ही सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणारे, महिला व पुरुष असे शेकडो कुटुंबे चिंच फोडण्याची कामे करत आहे. शहरातील ५०० कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांच्या उरनिर्वाहाचा तूर्त प्रश्न मिटला आहे. असे आडते व्यापारी संतोष भंडारी व परेश सुराणा यांनी सांगितले.

२१ शिरूर