शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

गरीब कुटुंबांना मिळाला जगण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे ...

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे महाग झाल्याचे समोर आले आहे. मध्यंतरीच्या काळात सर्व निर्बंध हटवण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी रोजगार उपलब्ध होत होता. विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येईल असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणाऱ्या व दररोज रोजंदारीने काम करून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणाऱ्या देशातील लाखो कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच शिरूर शहरातही अशी शेकडो कुटुंब राहत आहेत.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी, प्रकाश सुराणा व राजू दुगड यासह आडते दुकानदारांच्या या उन्हाळ्याच्या हंगामात शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे शेकडो टन चिंचेचा व्यवहार होतो. ही वाळलेली चिंचाचे टरफल फोडणे, चिंचोके वेगळे करणे, त्यांचा गाभा वेगळा करणे ही कामे केली जातात. यानंतर चिंचेच्‍या या घटकांचे पॅकिंग करून हे व्यापारी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात राज्यात खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या उपयोगासाठी पाठवितात.

ही वाळलेली चिंच या व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर सुमारे १५ ते २० किलो चिंच वजन करून घरी आणणे, फोडणे, त्यांचे चिंचोके वेगळे करणे, टरफले वेगळे करणे व पुन्हा वजन करुन देणे यासाठी प्रत्येकी किलोला सुमारे १० ते १५ रुपयांचा भाव या आडते व्यापाऱ्यांकडून दिला जातो. याप्रमाणे शहरातील ही सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणारे, महिला व पुरुष असे शेकडो कुटुंबे चिंच फोडण्याची कामे करत आहे. शहरातील ५०० कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांच्या उरनिर्वाहाचा तूर्त प्रश्न मिटला आहे. असे आडते व्यापारी संतोष भंडारी व परेश सुराणा यांनी सांगितले.

२१ शिरूर