शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

गरीब कुटुंबांना मिळाला जगण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे ...

कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे महाग झाल्याचे समोर आले आहे. मध्यंतरीच्या काळात सर्व निर्बंध हटवण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी रोजगार उपलब्ध होत होता. विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येईल असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणाऱ्या व दररोज रोजंदारीने काम करून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणाऱ्या देशातील लाखो कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच शिरूर शहरातही अशी शेकडो कुटुंब राहत आहेत.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी, प्रकाश सुराणा व राजू दुगड यासह आडते दुकानदारांच्या या उन्हाळ्याच्या हंगामात शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे शेकडो टन चिंचेचा व्यवहार होतो. ही वाळलेली चिंचाचे टरफल फोडणे, चिंचोके वेगळे करणे, त्यांचा गाभा वेगळा करणे ही कामे केली जातात. यानंतर चिंचेच्‍या या घटकांचे पॅकिंग करून हे व्यापारी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात राज्यात खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या उपयोगासाठी पाठवितात.

ही वाळलेली चिंच या व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर सुमारे १५ ते २० किलो चिंच वजन करून घरी आणणे, फोडणे, त्यांचे चिंचोके वेगळे करणे, टरफले वेगळे करणे व पुन्हा वजन करुन देणे यासाठी प्रत्येकी किलोला सुमारे १० ते १५ रुपयांचा भाव या आडते व्यापाऱ्यांकडून दिला जातो. याप्रमाणे शहरातील ही सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणारे, महिला व पुरुष असे शेकडो कुटुंबे चिंच फोडण्याची कामे करत आहे. शहरातील ५०० कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांच्या उरनिर्वाहाचा तूर्त प्रश्न मिटला आहे. असे आडते व्यापारी संतोष भंडारी व परेश सुराणा यांनी सांगितले.

२१ शिरूर