शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

राजकारण्यांची लुडबूड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2015 01:42 IST

कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही

पुणे : कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही. साहित्य संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा समावेश जरूर असावा; मात्र त्यांची लुडबूड नको, असे मत ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक उल्हास पवार यांनी नोंदवले.‘संवाद’ या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांचा रसिकांशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उल्हास पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुुं. शिंदे, स्वागताध्यक्ष विजय कोलते, घुमानमधील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, की प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा रसिक असतो. त्यामुळे त्याला संमेलनाची अभिरुची असणे साहजिक आहे. मात्र, संमेलनामध्ये अध्यक्षाला मानाचे स्थान मिळालेच पाहिजे. आजकाल साहित्य संमेलनाचा होत असलेला सोहळा, उत्सव साहजिक आहे. ते अवाजवी नाही; कारण हा आनंदाचा मेळावा आहे.श्रीपाल सबनीस म्हणाले, की संमेलनाध्यक्ष निवडणुकीबाबत पराभूतांपेक्षा त्यांच्या समर्थकांच्याच तक्रारी जास्त असतात. तक्रारदारांनी एकत्र येऊन विधायक नियमावली महामंडळाकडे सुपूर्त करावी. यंदा अध्यक्षीय भाषणाशिवाय त्याची एक विशेष मुलाखत घेण्याची सूचना महामंडळाकडे सुचवली आहे. सदानंद मोरे म्हणाले, की साहित्यिकच एकमेकांना मान देत नाहीत. व्यक्तीला पाठिंबा दिला तर निवडणुकीची गरजच भासणार नाही. त्यामुळे त्याचे मनोगत आशयघन असावे. त्याचे भाषण हा संमेलनानंतरही रसिकांच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा विषय असतो. त्यामुळे संमेलनात भूमिका मांडायला त्याला पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीत पार पडायला हवी. कारण, आनंद हे साहित्याचे अधिष्ठान असते. अध्यक्षाला संमेलनानंतरही रसिकांचे प्रेम मिळते आणि तोच त्याचा सन्मान असतो. राजकीय व्यक्तींनी रस दाखवला नाही तर संमेलन होणार नाही, असे मला वाटते. कारण, तोही साहित्यप्रेमीच असतो. साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा स्वागताध्यक्षांचा प्रयत्न असतो. त्यामुळे संमेलनांमध्ये साहित्यिक अस्पृश्यता नसावी. - फ. मुं. शिंदे, कवी