शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

राजकारण्यांची लुडबूड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2015 01:42 IST

कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही

पुणे : कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही. साहित्य संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा समावेश जरूर असावा; मात्र त्यांची लुडबूड नको, असे मत ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक उल्हास पवार यांनी नोंदवले.‘संवाद’ या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांचा रसिकांशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उल्हास पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुुं. शिंदे, स्वागताध्यक्ष विजय कोलते, घुमानमधील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, की प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा रसिक असतो. त्यामुळे त्याला संमेलनाची अभिरुची असणे साहजिक आहे. मात्र, संमेलनामध्ये अध्यक्षाला मानाचे स्थान मिळालेच पाहिजे. आजकाल साहित्य संमेलनाचा होत असलेला सोहळा, उत्सव साहजिक आहे. ते अवाजवी नाही; कारण हा आनंदाचा मेळावा आहे.श्रीपाल सबनीस म्हणाले, की संमेलनाध्यक्ष निवडणुकीबाबत पराभूतांपेक्षा त्यांच्या समर्थकांच्याच तक्रारी जास्त असतात. तक्रारदारांनी एकत्र येऊन विधायक नियमावली महामंडळाकडे सुपूर्त करावी. यंदा अध्यक्षीय भाषणाशिवाय त्याची एक विशेष मुलाखत घेण्याची सूचना महामंडळाकडे सुचवली आहे. सदानंद मोरे म्हणाले, की साहित्यिकच एकमेकांना मान देत नाहीत. व्यक्तीला पाठिंबा दिला तर निवडणुकीची गरजच भासणार नाही. त्यामुळे त्याचे मनोगत आशयघन असावे. त्याचे भाषण हा संमेलनानंतरही रसिकांच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा विषय असतो. त्यामुळे संमेलनात भूमिका मांडायला त्याला पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीत पार पडायला हवी. कारण, आनंद हे साहित्याचे अधिष्ठान असते. अध्यक्षाला संमेलनानंतरही रसिकांचे प्रेम मिळते आणि तोच त्याचा सन्मान असतो. राजकीय व्यक्तींनी रस दाखवला नाही तर संमेलन होणार नाही, असे मला वाटते. कारण, तोही साहित्यप्रेमीच असतो. साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा स्वागताध्यक्षांचा प्रयत्न असतो. त्यामुळे संमेलनांमध्ये साहित्यिक अस्पृश्यता नसावी. - फ. मुं. शिंदे, कवी