शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राजकारण्यांची लुडबूड नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2015 01:42 IST

कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही

पुणे : कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही. साहित्य संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा समावेश जरूर असावा; मात्र त्यांची लुडबूड नको, असे मत ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक उल्हास पवार यांनी नोंदवले.‘संवाद’ या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांचा रसिकांशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उल्हास पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुुं. शिंदे, स्वागताध्यक्ष विजय कोलते, घुमानमधील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, की प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा रसिक असतो. त्यामुळे त्याला संमेलनाची अभिरुची असणे साहजिक आहे. मात्र, संमेलनामध्ये अध्यक्षाला मानाचे स्थान मिळालेच पाहिजे. आजकाल साहित्य संमेलनाचा होत असलेला सोहळा, उत्सव साहजिक आहे. ते अवाजवी नाही; कारण हा आनंदाचा मेळावा आहे.श्रीपाल सबनीस म्हणाले, की संमेलनाध्यक्ष निवडणुकीबाबत पराभूतांपेक्षा त्यांच्या समर्थकांच्याच तक्रारी जास्त असतात. तक्रारदारांनी एकत्र येऊन विधायक नियमावली महामंडळाकडे सुपूर्त करावी. यंदा अध्यक्षीय भाषणाशिवाय त्याची एक विशेष मुलाखत घेण्याची सूचना महामंडळाकडे सुचवली आहे. सदानंद मोरे म्हणाले, की साहित्यिकच एकमेकांना मान देत नाहीत. व्यक्तीला पाठिंबा दिला तर निवडणुकीची गरजच भासणार नाही. त्यामुळे त्याचे मनोगत आशयघन असावे. त्याचे भाषण हा संमेलनानंतरही रसिकांच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा विषय असतो. त्यामुळे संमेलनात भूमिका मांडायला त्याला पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीत पार पडायला हवी. कारण, आनंद हे साहित्याचे अधिष्ठान असते. अध्यक्षाला संमेलनानंतरही रसिकांचे प्रेम मिळते आणि तोच त्याचा सन्मान असतो. राजकीय व्यक्तींनी रस दाखवला नाही तर संमेलन होणार नाही, असे मला वाटते. कारण, तोही साहित्यप्रेमीच असतो. साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा स्वागताध्यक्षांचा प्रयत्न असतो. त्यामुळे संमेलनांमध्ये साहित्यिक अस्पृश्यता नसावी. - फ. मुं. शिंदे, कवी